*वारकरी संतानी कृतीशील आचरनाद्वारे सांगितलेला समता अन बंधुभावाचा विचार घेउन निघणारी ‘ समता वारी ‘ समाज हिताची आहे – महंत ह भ प धर्मराज महाराज सामनगावकर*
समता वारी

*वारकरी संतानी कृतीशील आचरनाद्वारे सांगितलेला समता अन बंधुभावाचा विचार घेउन निघणारी ‘ समता वारी ‘ समाज हिताची आहे – महंत ह भ प धर्मराज महाराज सामनगावकर*

वारकरी संतांनी आपल्या अभंगातून बंधुता , मानवता व समतेचा विचार सांगितला, हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम चोखपणे ” चोखोबा ते तुकोबा- एक वारी समतेची ” करत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे, पंढरपूरच्या वाळवंटात सर्व जाती पंथाचे लोक एकत्र येत असत , तत्कालीन काळापासून पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तिरी वाळवंटात ‘ सामाजिक लोकशाहीची ‘ मुहूर्तमेढ वारकरी संतांनी केली , पंढरपूर चे वाळवंट हे सामाजिक लोकशाही अन मानवतावादाचे लोक विद्यापीठ आहे , वारकरी संतानी आपल्या कृतीशील आचरनाद्वारे सांगितलेंला समता अन बंधुभावाचा विचार घेउन निघणारी ‘ समता वारी ‘ दुरवर्षी सर्वस्पर्शी समाज हिताची आहे, सामाजिक विण घट्टट करण्याचे कार्य समता वारी उपक्रमाद्वारे घडु पाहत आहे . असे प्रतिपादन महंत धर्मदास महाराज सामनगावकर यांनी केले , समता वारी २०२४ची चित्रमय कार्य अहवाल पुस्तिका ‘ समता दर्शन ‘ च्या प्रकाशन प्रसंगी केले .

समाज माध्यमातून जात, धर्म , पंथ’ च्या नावे होत असलेला विद्वेशी प्रचार थांबून तरुण मंडळींना सकारात्मक विचार देण्यासाठी, रचनात्मक कार्यास प्रेरित करुन राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचा हातभार लागला पाहिजे, या हेतूने संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन यांच्या वतीने ही वारी मागील ६ वर्षांपासून निघत आहे. चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची २०२४ च्या चित्रमय कार्य अहवाल पुस्तिका ‘ समता दर्शन ‘ ही दिशादर्शक आहे .
असे प्रतिपादन समता वारी संयोजन समितीच्या अध्यक्षा प्रा अलका सपकाळ यांनी केले . सध्या समाजाला संतांच्या विचारांची गरज आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी प्रवृत्ती वाढत आहेत त्यामुळे माणसाची मन जोडण्याचा विचार घेऊन निघालेल्या समता वारीच्या विचारांची समाजाला गरज आहे . असे पुढे बोलतांना महंत ह भ प धर्मराज महाराज सामनगावकर यांनी सांगितले

श्री सदगुरु श्यामनाथ महाराज गुरुपीठ सामनगाव ता भूम येथे ‘ समता दर्शन ‘ या चित्रमय समता वारी पुस्तिकेचे अहवाल प्रकाशन करण्यात आले याप्रसंगी समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील , प्रा ज्ञानोबा सपकाळ , महारुद्र जाधव आदी उपस्थित होते . कार्यक्रमास स्थानिक भक्त परिवार उपस्थित होता .
