गावगाथा

धर्मसंकीर्तन सारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे राष्ट्रीय धर्मध्वजाची पताका उंचावत आहे.

श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी स्वामी दर्शनानंतर व्यक्त केले मनोगत.

धर्मसंकीर्तन सारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे राष्ट्रीय धर्मध्वजाची पताका उंचावत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी स्वामी दर्शनानंतर व्यक्त केले मनोगत.

HTML img Tag Simply Easy Learning    

(अ.कोट. श्रीशैल गवंडी, दिनांक१३/४/२५) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे. या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल असते. श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने कीर्तन, प्रवचन,
भक्तीसांगितीक कार्यक्रम या माध्यमातून देशभरात धर्मध्वजाची पताका घेऊन वाटचाल करणाऱ्या महात्म्यांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील धर्मसंकीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून मोठे धार्मिक व्यासपीठ लाभले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी श्री वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या धर्म संकीर्तन महोत्सवात देशातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, भक्तीसंगीतकार, नृत्यकार, भारूडकार, भजनकरी आदी कलाकार व व्याख्यात्यांना स्वामींची धार्मिक पद्धतीने सेवा करण्याची संधी मंदिर समिती उपलब्ध करून देत आहे ही बाब अत्यंत वंदनीय आहे. या निमित्ताने धर्मसंकीर्तन सारख्या धार्मिक कार्यक्रमांमुळे राष्ट्रीय
धर्मध्वजाची पताका उंचावण्यास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी न्यायमूर्ती वृषाली जोशी, विजय जोशी, अक्कलकोटचे दिवाणी न्यायाधीश मुकुल कल्याणकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी न्यायमूर्ती वृषाली जोशी बोलत होत्या. पुढे बोलताना न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्ताने स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले ही बाब अत्यंत समाधानकारक आहे. आमच्या प्रमाणे अन्य स्वामी भक्तांनीही स्वामींच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या मंगल पर्वकाळात भाविकांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेऊन जीवन कृतार्थ करावे असेही मनोगत व्यक्त करून श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंदिर समितीच्या वतीने आयोजित धर्मसंकीर्तन महोत्सवास व श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सवास मंदिर समितीला व सर्व भाविकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अक्कलकोटचे दिवाणी न्यायाधीश मुकूल कल्याणकर,अक्कलकोट न्यायालयाचे स्वप्निल मोरे, धनंजय कलमदाने, अविनाश सुरवसे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.हिरण्णा पाटील, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, विपुल जाधव, महेश मस्कले, धनराज स्वामी, श्रीकांत मलवे, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – न्यायमूर्ती वृषाली जोशी – विजय जोशी, न्यायाधीश मुकूल कल्याणकर, यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, प्रा.शिवशरण अचलेर व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button