गावगाथा

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी ;मल्लिनाथ कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम

छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी ;मल्लिनाथ कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम

अक्कलकोट :
छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी मोघलांविरुद्ध बंड पुकारले. प्राणाची आहुती देत स्वधर्माचे रक्षण केले. त्यातून त्यागाचा मानदंड घालून दिला. म्हणून त्यांच्या कार्यापासून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या संभाजी महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, समन्वयक मलकप्पा भरमशेट्टी, प्रा डॉ बाळासाहेब पाटील, प्रा शिल्पा धूमशेट्टी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राजनीती तसेच युद्धकलेत छत्रपती संभाजी महाराज
निष्णात होते. ते अत्यंत बुद्धिमान देखील होते. त्यांनी संस्कृत भाषेत बुधभूषण ग्रंथ लिहिला. त्यांनी हिंदी भाषेत देखील ग्रंथ लिहिले. ते महाविद्वान व व्यासंगी होते. त्यांनी भाषा आणि धर्म संस्कृतीचे रक्षण केले. म्हणून जगाच्या इतिहासात बुद्धिवंत,कीर्तिवंत महापराक्रमी राजा असा त्यांचा नावलौकिक आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक
इतिहास विभाग प्रमुख प्रा. मधुबाला लोणारी यांनी केले तर आभार प्रा भीम सोनकांबळे यांनी मानले.

चौकटीतील मजकूर

देश रक्षणासाठी तरुणांनी कटीबद्ध व्हावे

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे रक्षण अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. म्हणून तरुणांनी लष्करामध्ये भरती झाले पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन पराक्रम गाजवून देशाचे रक्षण केले पाहिजे, असे यावेळी प्रतिपादन डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले.

फोटो ओळ
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button