अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे न्यास उत्तमरित्या चालवीत असल्याने विकासाची घोडदौड पाहायला मिळत आहे -मनसे नेते बाळा नांदगावकर,
न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

*अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे न्यास उत्तमरित्या चालवीत असल्याने विकासाची घोडदौड पाहायला मिळत आहे -मनसे नेते बाळा नांदगावकर,

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे न्यास उत्तमरित्या चालवीत असल्याने विकासाची घोडदौड पाहायला मिळत असल्याचे मनोगत मनसेचे बाळा नांदगावकर, मुंबई यांनी व्यक्त केले.*

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची कार्य भक्ताभिमुख असल्याने आलेल्या स्वामी भक्त हा न्यासाला भेट देऊन महाप्रसाद घेतोच, भक्तांसाठी केलेल्या आवश्यक सोयीसुविधा ह्या गरज ओळखून मांडणी करण्यात आलेले आहे. म्हणूनच संपूर्ण परिसर हा सुंदर स्वच्छ असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या समवेत माजी सोलापूर मनसेचे दिलीप धोत्रे, अक्कलकोट मनसेचे मल्लिनाथ पाटील हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, निखील पाटील, पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
