वागदरी ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी,मुस्लिम बांधवांसाठी केले इफ्तार पार्टीचे आयोजन
वागदरीतील नागरिकांनी दिला धार्मिक ऐकापाचे संदेश

वागदरी ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी,मुस्लिम बांधवांसाठी केले इफ्तार पार्टीचे आयोजन


वागदरीतील नागरिकांनी दिला धार्मिक ऐकापाचे संदेश

वागदरी — सदाचार हा सर्वच धर्मांचा आधार आहे. मार्ग भिन्न,पण ध्येय एकच असते त्यालाच खरा मानव धर्म असे म्हटले जाते. रमजान महिन्यात वागदरी येथील नागरिक एकत्र येऊन येऊन आपल्या वागणुकीतून याच मानव धर्माची शिकवणच जणू देतात.रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून वागदरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासली.
हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. त्यामुळे एकमेकांच्या सुखदु:खांत सामील होता येते. अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजांतील एकोपा वाढीस मदत होईल, असे प्रतिपादन सुधीर सोनकवडे यांनी व्यक्त केले
समाजात बंधुभाव वाढावा याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात. हे उपवास केवळ आपल्याच समाजापुरतेच मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मांतील लोकांच्या कल्याणाकरिता धरतात. त्यात पवित्र रमजान महिन्यातील अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होईल असे बोलतात राजकुमार निरोळी यांनी व्यक्त केले
वागदरी येथील हिंदू मुस्लिम समाजातील बांधव दरवर्षी सण उत्सव एकत्र येऊन साजरा करतात गुण्यागोविंदाने राहतात.इफ्तार पार्टी साठी वागदरी प्रतिष्ठीत नागरिक सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी राजु निरोळी ,सुधिर सोनकवडे, रविकिरण वरनाळे ,नागप्पा घोळसगाव ,श्रीशैल सुतार, विजयकुमार घोळसगाव ,सरपंच श्रीकांत भैरामडगी, शिवानंद बाबा ,संतोष पोमाजी, शिवानंद घोळसगाव, शिवपुत्र धड्डे ,घाळय्या मठपती, तंटामुक्ती अध्यक्ष शाणप्पा मंगाणे, ईसराईल नदाफ आदि मान्यवर उपस्थित होते

