जीवनाच्या उन्नती करिता भाविकांनी स्वामींना शरण यावे – आमदार बी.आर. पाटील
आमदार बी.आर पाटील यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

जीवनाच्या उन्नती करिता भाविकांनी स्वामींना शरण यावे – आमदार बी.आर. पाटील

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१/६/२३) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे अनेक भक्त आहेत. वेळोवेळी ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामींचे दर्शन घेत असतात व आपल्या समस्या स्वामींसमोर मांडतात. स्वामी कृपेने अनेक भाविकांचे संघर्षमय जीवन तारून उद्धार झालेले आहे. मी पण एक स्वामीभक्त असून माझ्या राजकीय जीवन वाटचालीत अनेक समस्या संघर्ष यांना सामोरे जात असताना केवळ स्वामी कृपेने मानसिक बळ मिळत गेले. त्यामुळे आमच्या राजकीय जीवनाची उन्नती होऊन जनसेवेची संधी मिळालेली आहे. ही सर्व स्वामींची कृपा आहे. स्वामी भक्तीत लीन होऊन स्वामी चरणी शरण गेल्याने हे साध्य झालेले आहे. त्यामुळे भाविकांनी आपल्या जीवनाच्या उन्नती करिता स्वामींना शरण यावे असे मनोगत
जेष्ठ गांधीवादी नेते व आळंदचे नूतन आमदार बी.आर.पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आमदार पाटील बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, गिरीश पवार, श्रीकांत मलवे आदींसह जिद्दीमनी, दत्तकुमार साखरे, शिवराज बिराजदार, प्रमोद पाटील, विद्याधर गुरव, प्रशांत बिराजदार, अभियंता किरण पाटील, शिवशरण इचगे उपस्थित होते.

फोटो ओळ – आमदार बी.आर पाटील यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
