गावगाथा

श्याम ठाणेदार यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

पुरस्कार सन्मान

श्याम ठाणेदार यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रातील नामवंत स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्याम ठाणेदार यांना स्वराज्य क्रांती सेना पँथर्स आर्मी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श लेखक गौरव पुरस्कार २०२५ देण्यात आला आहे. श्याम ठाणेदार यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, पत्रकारिता व लेखन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आचार्य रतनलाल सोनाग्रा ( जागतिक कीर्तीचे विचारवंत ), संतोष आठवले ( राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष पँथर्स आर्मी स्वराज क्रांती सेना ), विठ्ठलदादा गायकवाड, ( मुख्य समन्वयक रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे ), ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी ( वरिष्ठ राजयोग शिक्षिका पुणे ), विक्रम शिंगाडे ( संस्थापक शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ) यांच्या हस्ते हा अत्यंत मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी यांच्या द्वारे पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन नवी पेठ येथे रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात कला, साहित्य, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत कुंबळे, आशुतोष येरल्लू , उमेश जामसंडेकर, समीर विकासपुरे, महेंद्र वाघमारे, संतोष लांडगे, सचिन माने, ऍड प्रीती पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button