महिला शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले ; डॉ. गणपतराव कलशेट्टी
अक्कलकोट –सी बी खेडगी महाविद्यालयात संस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री बसलिंगप्पा खेडगी साहेब यांच्या प्रेरणेने “भारतातील एक महान थोर समाज सुधारक आणि महिला शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात व प्रबोधनात्मकरित्या साजरा करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थिनी कुमारी नंदिनी कुंभार कुमारी विद्याश्री कोळी कुमारी श्रुती कलशेट्टी यांच्या हस्ते महान व थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये थोर समाज सुधारक व महिला शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतामध्ये सामाजिक समता सामाजिक विकास सामाजिक शिक्षण, शेतकरी वर्गांचे प्रबोधन, आणि शेतकरी वर्गांची आर्थिक व सामाजिक समस्या निवारण पद्धती, अस्पृश्यता निर्मूलन सामाजिक बंधुत्व यासारख्या महत्त्वपूर्ण भागामध्ये करण्यात आलेली समृद्धीयुक्त सर्वांगीण प्रगती राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेची भावना, सामाजिक व आर्थिक विषमता निर्मूलन, देशातील प्रत्येक घटकांचा विकासातील योगदान यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या विशेष शैक्षणिक प्रयत्नातून भारतामध्ये १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. म्हणून आज देखील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.आणि भारतातील पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देण्यात येते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस सी अडवितोट यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी विविध क्षेत्रात केलेलं चौफेर विकासात्मक कार्य व जातीव्यवस्था निर्मूलन करिता प्रयत्न ,शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक इत्यादी महत्त्वपूर्ण कार्यातील त्यांचा योगदान गौरवास्पद असा आहे. म्हणून आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः उच्च शिक्षणामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक आहे. आणि महाराष्ट्र राज्याचा उल्लेख करताना ” फुले – शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र ” असा केला जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे हे थोर समाज सुधारकानी केलेलं कार्य व प्रगती अवर्णनीय असा आहे. म्हणून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींनी त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा आपल्या शैक्षणिक, सामाजिक कृतियुक्त उपक्रमातून आचरणात आणावेत. ही एक महत्त्वपूर्ण अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य सौ व्हि एन वैद्य मॅडम व गणित विभागाचे प्रमुख प्रा.एन आय धनशेट्टी, हिंदी विभाग प्रमुख प्रा.विठ्ठलराव वाघमारे, मराठी विभाग प्रमुख डॉ .सी डी अणेकर प्रा. निलप्पा भरमशेट्टी प्रा. प्रकाश सुरवसे डॉ. लक्ष्मण ढाले प्रा. सौ वाय पी इळगेर प्रा. व्हि पी कोन्हाळी मॅडम प्रा. व्ही एम हाताळे मॅडम यांनी देखील आपले महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले. व त्यांच्या विचारातून उपस्थित विद्यार्थी वर्ग मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी कार्यालय प्रमुख श्री सुहास होटकर लिपिक श्री अशोक कोरे सेवक श्री धोंडप्पा शिंगे श्री अशोक इसापुरे श्री परमेश्वर कलबुर्गी श्री सिद्धाराम अरबळे विद्यार्थी श्री रोहन राठोड श्री सोहेल शेख श्री पवन भोसले सचिन अल्लापुरे समर्थ धनशेट्टी यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन व आभार कन्नड विभागातील प्रा.डॉ.गुरुसिद्धया स्वामी यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अशोक माळगे प्रा.श्रीकांत जिड्डीमनी, प्रा. श्री सिद्धाराम पाटील डॉ.आबाराव सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस आर बुक्कानुरे यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!