कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनच्या वतीने १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सत्कार सोहळ्यानंतर युवा व्याख्याते राहूल गिरी यांच्या व्याख्यानाचा अनेक विद्यार्थी व पालकांनी घेतला लाभ.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.०९/०६/२०२५) – येथील श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने आज दहावी व बारावी मधील गुणवत्तापूर्ण उत्तीर्ण झालेल्या ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन
सत्कार करण्यात आला. याप्रसंगी या सत्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर
अक्कलकोट पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ल.ख.पाटील, कराड येथील हुतात्मा बहूउद्देशीय कल्याणकारी संस्थेचे संस्थापक प्रमुख सुनिल फडतरे यांचाही तंत्रनिकेतनच्या वतीने श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांनी अक्कलकोट तालुक्यात गेल्या १५ वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थीना घडविण्यामध्ये अग्रेसर असलेल्या व तालुक्यातील एकमेव तथा एन.बी.ए. मानांकन प्राप्त असलेल्या कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे. १० वी, व १२ वी मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक पटकावून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशिष्ट सत्कार सोहळा याप्रसंगी संपन्न झाला हे आनंदाचे क्षण आहे. या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत / अभ्यासात (शिक्षणात) नक्कीच आवड निर्माण होईल असे सांगून कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनच्या वतीने १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे हे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी आयोजीत करण्यात आलेल्या युवा व्याख्याते राहूल गिरी यांच्या व्याख्यानाचा अनेक विद्यार्थी व पालकांनी लाभ घेतला. या प्रसंगी बोलताना व्याख्याते राहूल गिरी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणात टिकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. व्यवसायिक शिक्षणाची प्रणाली व ज्ञान विद्यार्थ्यांनी न समजल्यास महाविद्यालयातील शिक्षकांकडून वारंवार समजावून घ्यावे या करीता विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द व चिकाटी असणे गरजेचे आहे यासह आणखीन बरेच काही महत्वाचे मार्गदर्शन केले. यावेळी अक्कलकोट शहर
व तालुक्यातील सर्व संगणक केंद्राचे प्रमुख व सर्व प्रशालेचे मुख्याध्यापक विविध प्रशालेतील ४२० गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीनी व पालकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांनी, सुत्रसंचालन काशिनाथ घुरघुरे सर यांनी तर आभार विजयकुमार पवार सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्याकामी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे व प्रा.नागनाथ जेऊरे यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक अमोल भावठाणकर सर, कंप्युटर विभाग प्रमुख सचिन गायकवाड सर, सिव्हील विभाग प्रमुख नितीन ग्राम सर, सचिन घाटगे सर, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रशांत देसाई सर, मेकॅनिकल विभाग प्रमुख विजय कोरशेट्टी सर, सागर लोणारी सर, अमृता ममनाबाद मॅडम, जहागीरदार मॅडम, बिडवे मॅडम, बिराजदार मॅडम, निंबाळ मॅडम, म्हेत्रे मॅडम, विजय पवार सर, रविंद्र नष्टे, उमेश सोनवणे, चित्तरंजन अगरथडे, पांचाळ सर, बंटी नारायणकर, विपूल कडबगांवकर, संदीप गोंडाळ, सचिन पाटील, धर्माधिकारी, तळवार, पडवळकर, मल्लीकार्जून गवंडी, धनंजय माने, लवटे मॅडम, रामदे, अरवतकर, शेखर मनगुळे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ – गुणवंत विद्यार्थ्यांचा व व्याख्याते राहूल गिरी यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, प्राचार्य नागनाथ जेऊरे
व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!