गावगाथा

श्री स्वामी समर्थांची पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यातून परिक्रमा होऊन गुरुवारी अक्कलकोट मध्ये दाखल ..

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे.

श्री स्वामी समर्थांची पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यातून परिक्रमा होऊन गुरुवारी अक्कलकोट मध्ये दाखल ..

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २८ वे वर्ष असून, ८ महिने पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यातुन परिक्रमा होऊन दि.२६ जून रोजी सायंकाळी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत आगमन होऊन, अन्नछत्र मंडळात विसावली आहे.*

दरम्यान सोलापूरातून आगमन होताच श्रीक्षेत्र अक्कलकोट मार्गावर असलेल्या विजय बाग पालखी विसावा येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी पालखीचे दर्शन घेवून स्वागत केले. या बरोबरच विजयव्हिला या फार्महाऊस येथे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामींनी अमोलराजे भोसले यांच्यासह हिरकणी संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी दर्शन घेतले व पालखीचे पूजन करण्यात आले.

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आगमन होताच श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम आले. ते खंडोबा मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखीचे आमगन होताच फटाक्याची आतषबाजी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पालखीचे पुजन
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुधवार पेठेतील समाधी मठ येथे ही पूजन संपन्न झाले. याप्रसंगी चोळप्पा यांचे वंशज उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सहवाद्य मिरवणुकीने पालखी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे आगमन झाल्यानंतर वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व पुरोहीत मंदार पुजारी यांच्या उपस्थित आरती संपन्न झाले.होते.

दरम्यान सदरची पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागात गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. याकाळात सुमारे २४० दिवसामध्ये १५ हजार कि.मी.चा प्रवास सुमारे ५७५ गावे महाराष्ट्रातील ३५ जिल्हे व ७५ तालुक्यातून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो.

याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अहिल्या नगर, धाराशिव, बिड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून मागणी होत आहे.

न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येत नांही आशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी पोहोचते, असे नियोजन अन्नछत्र मंडळाकडून करण्यात येते.

श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे.

श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्र मंडळाच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत व शहरातील दिव्यांग, निराधार लोकांना समर्थ महाप्रसाद सेवा, तालुक्यातील ८० कुस्तीगीरांसाठी खुराकाचे वाटप दार महा करण्यात येत आहे व आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम राबविले जातात, तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.

याप्रसंगी उपाध्यक्ष अभय खोबेर, सचिव शामराव मोरे, दत्तात्रय जाधव, विश्वस्त व पालखी पराक्रमाचे मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, वैभव नवले, शितल फुटाणे, रोहित खोबरे, सौरभ मोरे, गणेश भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमनाथ कुलकर्णी व प्रा. शिवशरण अचलेर, प्रा. सायबण्णा जाधव, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा.मनोज जगताप, प्रा. चंद्रकांत पाटील, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, अशपक खाजी, मतीन पटेल, सनी सोनटक्के, बाळासाहेब पोळ, वासु कडबगावकर, अप्पा हंचाटे, वैभव मोरे, अ‍ॅड.संतोष खोबरे, पिंटू साठे, गोविंद शिंदे, अतिष पवार, प्रथमेश पवार, किरण साठे, विशाल कलबुर्गी, भरत राजेगावकर, राहुल मोरे, प्रविण घाटगे, गोटू माने, बाळासाहेब घाडगे, शिवकुमार स्वामी, सिध्दाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, नामा भोसले, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, समर्थ चव्हाण , पप्पू गडदे, स्वामींनाथ गुरव, शरद भोसले, संभाजी पवार, सुमित कल्याणी, बालाजी कटारे,, चंद्रकांत कुंभार, संजय गोंडाळ, मंगेश फुटाणे, गणेश पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, महादेव अनगले, आरएस.एस. तालुका कार्यव्ह चेतन जाधव, अनिल बिराजदार, विलास राठोड, अमर पोतदार, केदार तोडकर, फहिम पिरजादे, आकाश सूर्यवंशी, लक्ष्मण मचाले, बालाजी पाटील, युवराज लोणारी, प्रितिष किलजे, श्रीकांत मोरे, सुभाष पुजारी, रणजीत गोंडाळ, राहुल इंडे, पप्पू कोल्हे, निवास गवंडी, बाबूशा महिंद्रकर राजू काटकर, सुशील कुंभार, रमेश हलसंगी, विनायक भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button