अक्कलकोट येथे “स्वावलंबी भारत अभियान पश्चिम महाराष्ट्र प्रांत, उद्योजकता विकास यात्रेचा” शुभारंभ..
मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे व सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला

अक्कलकोट येथे “स्वावलंबी भारत अभियान पश्चिम महाराष्ट्र प्रांत, उद्योजकता विकास यात्रेचा” शुभारंभ..

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून नेहमीच राष्ट्र विकासासाठी हातभार व सहभाग असतो, याचाच एक भाग म्हणून “स्वावलंबी भारत अभियान पश्चिम महाराष्ट्र प्रांत, उद्योजकता विकास यात्रेचा” शुभारंभ मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे व सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.*

ही उद्योजकता विकास यात्रा जिल्ह्यातील ११ तालुके व ४० महाविद्यालयापर्यंत पोहचणार आहे. या माध्यमातून आत्मनिर्भर भारत, उद्यमशील विद्यार्थी, स्वदेशी पुरस्कार, आर्थिक महासत्ता, रोजगार निर्मिती, उद्योग सक्षमीकरण व कौशल्य विकास याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

याप्रसंगी उद्योजकता विकास यात्रा टीमचे सत्कार न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अभियानाचे दीपक परंगे, ओम इंगळे, यश उडणशिव, प्रतिक पावडे, ज्ञानेश्वर जाधव, चन्नविर बंकुर, श्रीनिवास पाटील, आकाश बाळीकाई, प्रसन्न गवंडी, समर्थ बाळीकाई हे उपस्थित होते.

यावेळी, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के. स्वामी, सिद्धाराम कल्याणी, धानप्पा उमदी, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, देवराज हंजगे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
