*उजनीच्या पाणी अक्कलकोटला मिळावी अन्यथा तहसिल समोर रिपाइं च्या अमरण उपोषण*
तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी अक्कलकोटच्या तहसिलदार यांना निवेदनात दिला आहे.

*उजनीच्या पाणी अक्कलकोटला मिळावी अन्यथा तहसिल समोर रिपाइं च्या अमरण उपोषण*

*अक्कलकोट(प्रतिनिधी)* उजनी धरणातील पाणी अक्कलकोट तालुक्यातील शेवटच्या केटिव्हेअर बबलाद गावाला सोडण्यात यावे. अन्यथा रिपाइं (आठवले गट)अक्कलकोट च्या वतीने उद्या गुरुवार दि.07/12/2023 रोजी सां.४-००वा पासून तहसिल कार्याल अक्कलकोट यांच्या समोर अमरण उपोषण करण्यात येईल.अशा इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी अक्कलकोटच्या तहसिलदार यांना निवेदनात दिला आहे.
उजनी पाण्याविना अक्कलकोटच्या शेतकरी वाट पाहात असून दिग्गज नेते मंडळीने आतापर्यंत आश्वासना शिवाय काहीही केली नाहीं म्हणून ही आक्रमक भूमिका रिपाइं ने उचलली असल्याचे यावेळी आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना मडिखांबे यांनी म्हंटले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील शेतकर्यांवर होणार्या अन्याय खपवून घेणार नाही तरी संबंधीत अधिकार्यांने जातीने लक्ष घालून या अक्कलकोट तालुक्यातील बबलाद पाटबंधार्याला पाणी भरण्यात यावे. अन्यथा रिपाइं कडून अमरण उपोषण करण्याच्या इशारा रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे,जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,रिपाइं मुस्लिम आघाडी शहर अध्यक्ष सैपन शेख,ता कार्याध्यक्ष राजु बोरगाव,ता कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, युवक चे शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे, सुरेश सोनकांबळे,हुच्चप्पा गायकवाड राजू माशाळे,शकील नाईकवाडी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
