
पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना योग्य सोयी सुविधा मिळाव्यात.

सध्या पोलीस भरती सुरू असून गोरेगाव, घाटकोपर, नवी मुंबई येथे दररोज मैदानी परीक्षा घेतल्या जात आहेत.यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनेक तरुण उपस्थित राहिले आहेत.पण यांच्या राहण्याची म्हणावी तशी व्यवस्था राज्य शासनाने केली नसून यामुळे अनेक तरुणांची परवड होत आहे.आज अशाच एका महादेव भोरकडे या पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाला भेटलो तेव्हा मी पुणे हडपसर येथून काल आलो असून आज उद्या माझी मैदानी परीक्षा असल्याचे त्याने सांगितले. त्यात प्रामुख्याने साडे सात किलो वजनाचा गोळा साडे आठ मीटर लांब फेकणे, २५ मिनिटात ५ किमी धावणे, १२ सेकंदात १०० मीटर धावणे अशी परिक्ष असल्याचे सांगून मैदानी परीक्षा पास झालो तर पुढे लेखी परीक्षा घेतली जाते आणि त्यात उत्तीर्ण झलो तर लागलीच नेमणूक देतात असे तो म्हणाला.साधारण दररोज हजार दीड हजार तरुणांची परीक्षा घेतली जाते.अजून दहा बारा दिवस मैदानी परीक्षा असल्याचे त्याने सांगितले.आलेल्या तरुणांची कोणतीच व्यवस्था नसल्याने बिचारे अनेकजण ब्रीजखाली, काहीजण स्थानिक मंदिरात उतरलेले आहेत.उद्याचे देशाचे हे तरुण भविष्य असून त्यांना भरतीवेळी, चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायची जबाबदारी शासनाची आहे.मध्यंतरी दोन तरुण भरती दरम्यान मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या वाचल्या.तेव्हा तरुणाची मानसिकता देखील व्यवस्थित राहण्यासाठी त्यांच्या सोयी सुविधांना प्राधान्य द्यायला हवे.यासाठी गोरेगाव दिंडोशी चे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला होता.पण अजून म्हणावी तशी व्यवस्था करण्यात राज्य शासन कमी पडल्याचेच चित्र आहे.अनेक ठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते या तरुणांच्या मदतीसाठी धावून येत असल्याचे दिसून आले.
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व
