गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पालखी परिक्रमा यंदाचे २७ वे वर्ष ६ महिने पालखी पादुका महाराष्ट्र कर्नाटक,गोवा राज्यासह परिक्रमा करून पुन्हा अक्कलकोट नगरी विसावली उत्साहात स्वागत

पालखी परिक्रमा २०२४

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पालखी परिक्रमा यंदाचे २७ वे वर्ष ६ महिने पालखी पादुका महाराष्ट्र कर्नाटक,गोवा राज्यासह परिक्रमा करून पुन्हा अक्कलकोट नगरी विसावली उत्साहात स्वागत

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट :(प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २७ वे वर्ष असून, ६ महिने पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दि.१२ जून २०२४ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत सायंकाळी अन्नछत्र मंडळात विसावली आहे.

सोलापूरातून आगमन होताच श्रीक्षेत्र अक्कलकोट मार्गावर असलेल्या विजय बाग पालखी विसावा येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी पालखीचे दर्शन घेवून स्वागत केले. या बरोबरच विजयव्हिला या फार्महाऊस येथे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले यांच्यासह हिरकणी संस्थेच्या महिला पदाधिकारी व सदस्यांनी दर्शन घेतले व पालखीचे पूजन करण्यात आले.

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे आगमन होताच श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम आले. ते खंडोबा मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालखीचे आमगन होताच फटाक्याची आतषबाजी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पालखीचे पुजन प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बुधवार पेठेतील समाधी मठ येथे चोळप्पा यांचे वंशज उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन सहवाद्य मिरवणुकीने पालखी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे पुरोहीत मंदार पुजारी हे उपस्थित होते. त्यानंतर अन्नछत्र मंडळात विसावली. यावेळी मंडळात विधिवत पूजन, आरती संपन्न झाली.

दरम्यान सदरची पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागात गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. याकाळात सुमारे १८३ दिवसामध्ये १० हजार कि.मी.चा प्रवास सुमारे ५०० गावे महाराष्ट्रातील ३५ जिल्हे व ७५ तालुक्यातून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील 2 जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो.

याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अ.नगर, उस्मानाबाद, बिड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून मागणी होत आहे.

न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येत नांही आशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी पोहोचते, असे नियोजन अन्नछत्र मंडळाकडून करण्यात येते.

श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे.

श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्र मंडळाच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत व शहरातील दिव्यांग, निराधार लोकांना समर्थ महाप्रसाद सेवा, तालुक्यातील ७६ कुस्तीगीरांसाठी खुराकाचे वाटप दार महा करण्यात येत आहे व आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम राबविले जातात, तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.

याप्रसंगी प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबेर, सचिव शामराव मोरे, कु.हर्षवर्धनराजे भोसले, विश्वस्त व पालखी पराक्रमाचे मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, गणेश भोसले, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमनाथ कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, सनी सोनटक्के, वासु कडबगावकर, अप्पा हंचाटे, राजु नवले, शितल फुटाणे, वैभव मोरे, सौरभ मोरे, निखिल पाटील, रोहित खोबरे, अ‍ॅड.संतोष खोबरे, अभियंता अमित थोरात, लक्ष्मण शिंदे, पिंटू साठे, गोविंद शिंदे, संतोष बिराजदार, अतिष पवार, प्रथमेश पवार, किरण साठे, विशाल कलबुर्गी, ऋषिकेश खराडे, वैभव कामनूरकर, भरत राजेगावकर, राहुल मोरे, प्रविण घाटगे, गोटू माने, बाळासाहेब घाडगे, शिवकुमार स्वामी, सिध्दाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, नामा भोसले, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, रोहित निंबाळकर, पप्पू गडदे, अण्णा सावंत, श्री गुरव, शरद भोसले, संभाजी पवार, प्रथमेश परदेशी, विकास पवार, सुमित कल्याणी, मंगेश कुलकर्णी, सोमनाथ शिंदे, शरद पवार, रोहित पवार, अमर मसुरे, मैनुद्दीन कोरबू, महादेव पवार, कुमार पाटील, संजय शिंदे, अंकुश चौगुले, बालाजी कटारे, सागर जाधव, चंद्रकांत कुंभार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button