
*शिवानंद जोगदंड हे खऱ्या अर्थाने समाज भूषण आहेत – साहेबराव धनगे*
नांदेड (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते शिवानंद केशवराव जोगदंड यांनी सामुहिक विवाह मेळाव्यांची फार मोठी मोहिम हातात घेतली असून ते खऱ्या अर्थाने समाज भूषण आहेत असे प्रतिपादन मा. जि. प. सदस्य साहेबराव धनगे यांनी केले.
येथील पृथ्वी लाॅन्स सभागृहात साईप्रसाद फाऊंडेशनच्या वतीने साईप्रसाद शिवानंद जोगदंड याच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव धनगे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराव जोगदंड हे होते.
केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर शुभेच्छापर मार्गदर्शन करतांना साहेबराव धनगे पुढे म्हणाले की, घरात आपला एखादा विवाह सोहळा असेल तर आपली किती तरी तारांबळ उडत असते परंतु शिवानंद जोगदंड यांनी समाजाचे असंख्य विवाह एकत्र एका छत्राखाली सामुहिक स्वरुपात घडऊन आणले आहेत. शालेय विद्यार्थांनाही ते नेहमी शालेय साहित्याचे वाटप करीत असतात. त्यांचे हे कार्य वाखाणण्यासारखे आहे.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचलन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दुधंबे आणि तुकाराम टोम्पे यांनीही यावेळी आपले मनोगत मांडले. मंचावर एन. के. तायडे, शिवानंद जोगदंड, सौ. शोभाताई जोगदंड आणि सत्कारमूर्ती साईप्रसाद जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
किशनराव गवळी, ॲड. राम जोगदंड, नरसिंगराव सुर्यवंशी, सदाशिव आडेराव, ॲड. सिद्धेश्वर खरात, गोविंद वाघमारे, केरबा गंगासागरे, प्रल्हाद कोरडे, नारायण वाघमारे, विठ्ठल शेट्टी, नारायण अन्नपुरे, रामचंद्र असोरे, दादाराव वाघमारे, रोहिदास सुर्यवंशी, विजय कांबळे आदिंनी यावेळी अभिष्टचिंतन केले. अखिल भारतीय गुरु रविदास कर्मचारी समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष भीमराव वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवराज कांबळे, संजय जोगदंड, श्रीनिवास कांबळे, बालाजी वाघमारे, संतोष बोराळकर, सुरेश वाघमारे, माधव सुर्यवंशी, लक्ष्मण वाघमारे, राजू बनसोडे, संजय वाघमारे, विपुल देगलूरकर आदिंनी परिश्रम घेतले. स्नेहभोजना नंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
