गावगाथा

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली धार्मिक कार्याला महत्व देत न्यास नेहमीच कार्यरत आहे कृषी भूषण गोविंदराव पवार 

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली धार्मिक कार्याला महत्व देत न्यास नेहमीच कार्यरत आहे कृषी भूषण गोविंदराव पवार 

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक कार्याला महत्व देत न्यास नेहमीच कार्यरत असल्याचे मनोगत कृषी भूषण गोविंदराव पवार यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात वसुंधरा ट्री फौंडेशन मुंबई यांच्या वतीने दि. २९ जानेवारी रोजी प्रयागराज त्रिवेणी संगम येथे वृक्षा अर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून वनकुंभ, अग्नि कुंभ, जल कुंभ आशा या महाकुंभ मेला २०२५ करिता केशर आंबा, पिंपळ, नारळ त्रिवेणी संगम आशा या कार्यक्रमाला अन्नछत्र मंडळात विधिवत पूजा करून मशाल पेटवण्याचा कार्यक्रम न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कृषी भूषण गोविंदराव पवार बोलत होते.

यावेळी डॉ. चंद्रकांत संभाजी पांडव, पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, धनंजय निंबाळकर, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button