गावगाथा

खेळामुळे मन मनगट मेंदू ला बळकटी प्राप्त होते मल्लिकार्जुन मसुती

कल्याणशेट्टी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा ..

खेळामुळे मन मनगट मेंदू ला बळकटी प्राप्त होते
मल्लिकार्जुन मसुती

कल्याणशेट्टी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा ..

अक्कलकोट
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी खेळापासून दूर होत आहेत त्यामुळे कुटुंबात कमाली चे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे अशा स्थितीत महाविद्यालयांनी क्रीडा स्पर्धा आयोजित करून मुलां मुलींमध्ये खेळाची आवड निर्माण केली पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे संचालक मल्लिकार्जुन मसुती यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील जिमखाना विभागाने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, जुनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, खेळामुळे मनाची मशागत होते, मनगट बळकट होतात, मेंदू निरामय होतो. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, म्हणून विद्यार्थ्यांच्या हितासाठी खेळाच्या स्पर्धा शिक्षकांनी आयोजित केल्या पाहिजेत.

प्रारंभी मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रमुख रंजना चव्हाण यांनी केले. आभार कुमार जाधव यांनी मानले.
यशस्वीतेसाठी प्रा भीम सोनकांबळे प्रा राजेश पवार प्रा डॉ बाळासाहेब पाटील, डॉ शीतल झिंगाडे, प्रा मधुबाला लोणारी, प्रा मनीषा शिंदे, बालाजी कांबळे यांनी प्रयत्न केले.

चौकटीतील मजकूर

वैयक्तिक व सांघिक खेळाच्या स्पर्धाचे आयोजन..

100 मीटर धावणे गोळा फेक थाळीफेक हे वैयक्तिक तर कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल हे सांघिक खेळ जिमखाना विभागाने आयोजित केले. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे नियोजन प्राध्यापिका रंजना चव्हाण यांनी केले.

फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करताना मल्लिनाथ मसुती व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button