गावगाथा

वर्धमान महावीर यांची शिकवण आचरणात आणणार कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी घेतली शपथ

कल्याणशेट्टी महाविद्यालयात वर्धमान महावीर जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करून स्वयंसेवकांनी शपथ घेतली.

वर्धमान महावीर यांची शिकवण आचरणात आणणार कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी घेतली शपथ

अक्कलकोट
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांनी अहिंसा सत्य असतेय ब्रह्मचर्य अपरिग्रह अशी पाच तत्वे सांगितली त्यांनी दिलेली ही शिकवण आयुष्यभर आचरणात आणणार अशी शपथ कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी घेतली.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात वर्धमान महावीर जयंती निमित्त रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी स्वयंसेवकांना ही शपथ दिली.
मुक्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, नेहमी सत्य बोलेन, संदर्भ ग्रंथाचे वाचन करून शाश्वत ज्ञान प्राप्त केले जाईल अशी शपथ स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे घेतली. यावेळी प्रा डॉ बाळासाहेब पाटील, बालाजी कांबळे, महेश जोगदे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन कल्याणशेट्टी, संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, मल्लिकार्जुन मसुती, जूनियर विभाग प्रमुख पुनम कोकळगी, सेमी विभाग प्रमुख रूपाली शहा व प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी कौतुक केले.

चौकटीतील मजकूर

विद्यार्थ्यांचा सामाजिक प्रसार माध्यमांवर उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी वर्धमान महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाची अहिंसा शपथ सामाजिक प्रसार माध्यमावर प्रसारित केली त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात वर्धमान महावीर जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करून स्वयंसेवकांनी शपथ घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button