विद्यार्थ्यांनी विचाराची उंची वाढवावी ; शांभवी कल्याणशेट्टी
कल्याणशेट्टी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

विद्यार्थ्यांनी विचाराची उंची वाढवावी ; शांभवी कल्याणशेट्टी

कल्याणशेट्टी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

अक्कलकोट :
महाविद्यालयातून युवकांना शाश्वत ज्ञान मिळत असल्यामुळे वाचन चिंतन करून विद्यार्थ्यांनी प्रगल्भ विचाराची प्राप्ती केली पाहिजे. जीवन जर सुखमय व आनंददायी करावयाचे असेल तर विचारांची उंची वाढवली पाहिजे असे प्रतिपादन शांभवीताई कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. व्यासपीठावर संचालक मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली पाहिजे, जिद्द चिकाटीमुळे यशाची प्राप्ती होते, कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सतत विद्यार्जन केले पाहिजे.
मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, पारितोषिक मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोश निर्माण होतो. अभ्यासाबरोबर खेळ, सांस्कृतिक, कला व साहित्य यामध्ये तो अभिरुची घेतो आणि त्यातूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा राजशेखर पवार यांनी केली प्रस्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे-भस्मे यांनी केले आभार प्रा डॉ बाळासाहेब पाटील यांनी मानले.
चौकटीतील मजकूर
भारत हा तरुणांचा देश आहे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशाचा दौरा करताना ‘आमचा भारत हा तरुणांचा देश असून सशक्त आहे ‘ असे अभिमानाने सांगतात. त्यांची संकल्पना साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात पारंगत झाले पाहिजे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांसोबत पारितोषिक प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनी.