
गौतम बुद्धाचे विचार आजही काल सुसंगत ;
प्राचार्य डॉक्टर शिवराय आडवितोट
आजच्या या युगामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे मोठ्या प्रमाणात मानवी जीवन सुसह्य झाले. हे होत असताना मानव मात्र अशांत, विसंवादी होत आहे. कारण काळाच्या ओघांमध्ये आपण आपल्या संस्कृतीने अनेक संत महात्म्याची विचारधारा विसरून सर्व काही स्वतःसाठी पाहिजे, मी, माझे,माझ्यासाठी या पलीकडे विचारधारेपासून लांब गेलेल्या समाजाला आज खऱ्या अर्थाने गौतम बुद्धाच्या
वि चारधाऱ्याची नितांत आवश्यकता आहे.
एका महान राजाचं रूपांतर एका महान तत्ववेत्ते मध्ये होणे हे जगातील एकमेव उदाहरण आहे.
जग आज अनेक प्रकारच्या संघर्षाच्या वाटेवर असताना ‘युद्धाऐवजी बुद्ध हवे,’ हे सर्व राजकीय नेत्यांना अंतर मनातून पटत असले तरी राजकीय स्वार्थापोटी, स्वतःच्या महत्वकांक्षापोटी संपूर्ण जगाला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. वास्तविक पाहता बुद्धांची शिकवण करुणा, अहिंसा, मानव कल्याण अशा विचारधारेवर असलेली असताना आपण देखील या विचारधारेपासून खूप लांब गेलेले आहोत. ही विचारधारा पुन्हा रुजवण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे त्यातूनच अशा विचारधारेचे पुनर्जीवन होऊ शकते व जग पुन्हा एकदा शांततेकडे वाटचाल करू शकेल.
आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास नेहमी जगाला दिशादर्शक देणार होता,आहे व पुढे राहील यात शंका नाही. आपण सर्व अशा देशात राहतो ज्या देशाने,’वसुदेव कुटुंबकम’ ची संकल्पना संपूर्ण जगाला दिली. यातूनच गौतम बुद्धाच्या विचाराचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात मनशांतीसाठी, समाजात शांतता नांदावी, कोणत्याही प्रकारच्या युद्धाची चर्चा होता कामा नये. कारण जगाचा इतिहास सांगतो युद्धामुळे कोणाचेच फायदा झालेला नाही. शांततेसाठी गौतम बुद्धाची विचारधारा त्यामध्ये प्रामुख्याने बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम् गच्छामि, संगम शरणम् गच्छामि ही उदात्त विचारधारा मानवी जीवनाकारीता प्रेरणादायी ठरलेली आहे. संघशक्तीचा वापर नेहमी मानवी कल्याणासाठीच व्हावे असे त्यांच्या विचार मंत्रातून, तत्त्वातून प्रकट झाले आहे.या विचारसरणीचा वापर आपण प्रत्येकाने स्वीकारावे त्याच तत्वावर जीवनाचरण करावे तरच गौतम बुद्धाला खऱ्या अर्थाने नमन व स्मरण करण्यासारखे होईल, अन्यथा केवळ प्रतिमा पूजा मिरवणूक यातून त्यांनी दिलेला संदेश बाजूला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली गेली पाहिजे.
गौतम बुद्ध हे कोणत्या धर्माचे जातीचे असा विचार कोणीही न करता त्यांनी मांडलेली विचारधारा मानवी कल्याणासाठी होती त्या विचारधारेचे पुनरुज्जन कसे करता येईल यासाठी प्रत्येक मग ते राजकीय सामाजिक, धार्मिक संस्कृतिक, शैक्षणिक कोणती संघटना असो त्या सर्व संघटनेतील पदाधिकारी सभासद यांनी जाणीवपूर्वक ही विचारधारा अमलात आणण्यासाठी प्रयत्न केल्यास आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन करण्याचे सार्थक होईल.
आज संपूर्ण जगाला कोणत्याही प्रकारचा दहशतवाद, चुकीच्या संघशक्तीच्या जोरावर कमजोर गरीब वर्गांना वेठीस धरणारे किंवा स्वतःच्या ताकदीवर सामान्यांची पिळवणूक करणारे मग ती संघशक्ती असू दे किंवा व्यक्ती असू दे ही गौतम बुद्धांना कदापि मान्य नव्हती. जगाच्या इतिहासामध्ये प्रत्येक काळामध्ये ज्या ज्या थोर विचारवंतानी मानवी कल्याणाचे विचार मांडले तेच विचार आजच्या युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने मांडता येऊ शकते.
बुद्धांची विचारधारा आजच्या काळात काल सुसंगत आहेत. ज्ञानेश्वरी या अक्षर ग्रंथात ज्ञानदेवाने म्हटल्याप्रमाणे, सिंह कोणालाही मदत मागत नाही. पक्षी पक्षावर घरटे करतात, पण वृक्ष पक्षांना पैसे मागत नाही, कडक उन्हात सावली देणारा
डे रेदार वृक्ष माणसाचे उन्हापासून विनामूल्य रक्षण करतो या तत्त्वाचा आपण सर्वांनी अंगीकार करावा. समाजाला शांततेकडे गौतम बुद्धाच्या विचारधारेचे अनुकरण करत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या विचारसरणीच्या प्रमाणे अमलात आणले व त्याप्रमाणे स्वतःचे जीवन समाजातील तळागाळातल्या लोकांकरता अर्पण केले. महात्मा बसवेश्वर यांनी देखील हीच विचारधारा जगासमोर मांडली आणि लोकांना शांततेचा संदेश दिला गेला. आजच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात स्वार्थ सोडून आपण बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही विचारधारा पुनर्जीवित करू या. जगात शांतता नांदण्यासाठी गौतम बुद्धाच्या विचारांचे अनुकरण करूया. तरच बुद्ध पौर्णिमा साजरी केल्याचा समाधान आपणास खऱ्या अर्थाने मिळेल.
गौतम बुद्धाच्या विचाराने प्रेरित होऊन, महात्मा गांधीजींनी त्यांचे आवडते भजन,’ वैष्णव जन तो तेणे कहीये! जो प्रीत पराई जाने रे!’ समाज जीवन शांतीने कसे राहील या थोर महात्म्यांचे लक्ष होते.
राजा जनक आणि त्यांचे अध्यात्मिक गुरु आष्टावक्र यांनी’ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती! देह कष्टविति परोपकारे!
या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण जीवन जगूया तरच बुद्ध पौर्णिमा साजरी केल्याचं सार्थक होईल.
प्राचार्य डॉक्टर शिवराय आडवीतो ट
खेडगी महाविद्यालय अक्कलकोट 9022020010
