📰 वागदरी मंडळातील शेतकऱ्यांचे पंचनाम्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन
अक्कलकोट – अक्कलकोटचे विद्यमान लोकप्रिय आमदार श्री. सचिन दादा कल्याण शेट्टी, तालुका कृषी अधिकारी श्री. मंगरूळे साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांना वागदरी मंडळातील गावातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पंचनाम्यासाठी निवेदन सादर केले.
ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी करण्यात आली. तसेच, मे 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबाग व द्राक्षबागांचे पंचनामे झाले होते व काही गावांना शासनाने आर्थिक सहाय्यही मंजूर केले आहे. मात्र शिरवळवाडी व सदलापूर या गावांचा पंचनामा होऊनही त्यांना या यादीतून वगळण्यात आले असून, त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या गावांनाही इतर गावांप्रमाणेच नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावेळी मा. जि. प. सदस्य आनंद तानवडे यांनी पुढाकार घेतला. यावेळी वागदरी सरपंच शिवानंद घोळसगांव, ज्येष्ठ नेते श्रीशैल ठोंबरे, मुल्ला गुरुजी, गजू पाटील, धनया स्वामी, प्रदीप वडगाव, श्रीमंत पाटील, रमेश चिडगुंपी, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, किरण कुंभार, संजू बेल्ले ,मल्लू उणदे,सह अनेक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 या निवेदनामुळे वागदरी मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!