स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटच्या नावलौकिकात भर – निलीमा सामंत
निलीमा सामंत यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामींच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटच्या नावलौकिकात भर – निलीमा सामंत
(प्रतिनिधी अक्कलकोट,दि.११/११/२४) – अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अक्कलकोट नगरी ही स्वामींची कर्मभूमी आणि पुण्यभूमी आहे. वटवृक्ष मंदिरात याची प्रचिती भाविकांना आजही येते. स्वामी समर्थांच्या या प्रचितीमुळे स्वामी भक्तांची दिवसेंदिवस वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाकरिता भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.
त्यामुळे स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोटच्या नावलौकिकात भरच पडलं असल्याचे भावोद्गार राज्य कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या धर्मपत्नी निलीमा सामंत यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी निलीमा सामंत यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी निलीमा सामंत बोलत होत्या. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, महेश काटकर, विपुल जाधव, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – निलीमा सामंत यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
