गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : आदर्श आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी “योग” महत्त्वाचा – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट दि. 21 :- विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विठ्ठल मंदिर प्रांगण येथे होम हवन, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मल्लिनाथ (अण्णा) स्वामी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी परमेश्वर जकापुरे, प्रभाकर मजगे, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, रजाक सय्यद, अमर पाटील, मल्लिकार्जुन मसूती, राजशेखर हिप्परगी, सुरेश शटगार सर व योगशिक्षक कस्तुरीताई गुरव व परमेश्वर गुरव साहेब उपस्थित होते.

 विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त सर्वांना सुदृढ व उत्तम आरोग्य राखण्यासाठी शुभेच्छा दिले. योग करण्याचा उद्देश म्हणजे आपल्या जीवनाचा विकास करणे आहे. योग निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी अतिशय आवश्यक आहे. दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते असे प्रतिपादन केले. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यमातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेऊ शकतो. आपल्या रोजच्या जीवनात दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते. योगामुळे मोठमोठ्या आजारावर मात व मानसिक ताणतणाव सुद्धा दूर करू शकतो. शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम करण्यासाठी योगासन हे रामबाण उपाय आहे. 

 योग ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. योगाचे महत्त्व भारताने संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे. त्यामुळेच हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊन योगाचा प्रसार व प्रचार केला पाहिजे असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

     योग शिबिरास विलास कोरे, राजशेखर उबराणीकर, विजयकुमार पाटील, दयानंद बिडवे, डॉ.सतीश बिराजदार, मलकप्पा भरमशेट्टी सर, शिवानंद बिंदगे, विरेंद्र पाटील, राजेंद्र सुरवसे, विश्वनाथ देवरमनी, अंदूअण्णा कळके, संजय हारकुड, गुरूपादप्पा आळगी, नगरसेवक अंबण्णा चौगुले, कांतु धनशेट्टी, ऋतुराज उर्फ बंटी राठोड, नागराज कुंभार, अतिश पवार, सिद्धू माळी, अंकुश चौगुले, प्रकाश पाटील, निंगराज कोटनुर व प्रतिष्ठानचे पदाधिकारी व योगप्रेमी उपस्थित होते.

       या शिबिराचा शहरातील जेष्ठ नागरिक विद्यार्थी व महिला वर्ग यांनी लाभ घेतले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गुरव सर तर आभार चंद्रकांत दसले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button