इन क्लब झिंदाबादचा नारा देत अमर बलिदान दिन जल्लोषात साजरा.
•राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज राष्ट्रीय अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली

इन क्लब झिंदाबादचा नारा देत अमर बलिदान दिन जल्लोषात साजरा.
अक्कलकोट
इन क्लब झिंदाबाद! शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव अमर रहे अमर रहे! बोलो भारत माता की जय ! वंदे मातरम् ! चा जय घोष करीत जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात अमर बलिदान दिन कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
देशाच्या स्वांतत्र्यसाठी आपले अमूल्य जीवनाची बलिदान दिलेली महान स्वांतत्र्यवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा बलिदान दिन आणि श्री रेवणसिद्देश्वर जयंती यात्रा महोत्सव निमित्त देशभक्ती कार्यक्रम अककलकोट येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराजांनी बिदर वरून एक ट्रक ऊस, ऊस गाळप मशीन आणि २५ हजार ग्लास सोबत आणले होते. दिवसभर देशभक्तना महाराजांनी प्रसाद म्हणून उसाचे थंडगार रस स्वतः वाटप केले. यावेळी प्रथम आदरणीय राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीते व जयजयकाराने आसमंत दणाणून गेले.
या प्रसंगी माजी गृराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे,श्री शरण मठ ट्रस्ट अध्यक्ष नीलगार, कलबुर्गीचे उद्योगपती शहाजी पाटील, समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते ॲड. वैजनाथ झळकी, जय कर्नाटक समितीचे प्रदेश अध्यक्ष मल्लिनाथ सारडा,ॲड. मंगरुळे,माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा मुत्तु खेडगी, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी,बाजार समिती उपसभापती अप्पासाहेब पाटील,विलास कोरे,माजी नगरसेवक नागराज कुंभार,माजी पंचायत समिती सदस्य सिध्यया मठपती, अक्लकोट बाजार समिती सदस्य धनराज बिराजदार, सरपंच प्रदीप पाटील,सरपंच व्यंकट मोरे, राहुल काळे कुरनुर,गट शिक्षण अधिकारी अरबाळे, धुळप्पा भजे,पत्रकार विरपाक्ष कुंभार, शिवानंद फुलारी,बसवराज बिराजदार आदीसह देशभरातून मोठ्या प्रमाणात देशभक्त उपस्थिती होती.सूत्रसंचालन वीरभद्र स्वामी यांनी केले तर आभार बिराजदार कॅसियर यांनी मानले.

चौकट
कोणीही जात, पात, धर्म, पक्ष यांच्या आधारावर लढू नये. आज प्रत्येकासाठी देश आणि राष्ट्रधर्म हा सर्वोच्च असला पाहिजे. सर्व धर्मांमध्ये समानता असली पाहिजे. देशाला होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी सर्व भारतीयांनी एकरूप व्हावे, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
•राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज राष्ट्रीय अध्यक्ष जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली
