श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ राज्यातील धर्मादाय संस्थेतील एक अग्रगण्य संस्था असून, एकाच छताखाली महाप्रसाद सेवेबरोबरच विविध उपक्रम उल्लेखनीयरित्या राबविल्या जातात — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील
अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ राज्यातील धर्मादाय संस्थेतील एक अग्रगण्य संस्था असून, एकाच छताखाली महाप्रसाद सेवेबरोबरच विविध उपक्रम उल्लेखनीयरित्या राबविल्या जातात — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून राज्यातील धर्मादाय संस्थेतील एक अग्रगण्य संस्था असून, एकाच छताखाली महाप्रसाद सेवेबरोबरच विविध उपक्रम उल्लेखनीयरित्या राबविल्या जात असल्याचे मनोगत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.*

ते सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या उपस्थितीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ना.चंद्रकांत पाटील हे बोलत होते. त्यांच्या समवेत सुविद्य पत्नी सौ.अंजली चंद्रकांत पाटील उपस्थित होत्या.

ना.चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने गेल्या ३८ वर्षाच्या कालखंडात श्री स्वामी भक्तांच्या सेवेबरोबरच न्यासाकडून सुरु केलेल्या दिव्यांग व निराधारांना समर्थ महाप्रसादसेवा, शहर व तालुक्यातील कुस्तीगीरांसाठी प्रसादरुपी खुराक दिला जातो. अशा या योजना न्यास राबवीत आहे. ही बाब कौतुकास्पद असून, राज्यातील धर्मादाय संस्थांनी अन्नछत्र मंडळाचा आदर्श घेतला पाहिजे. याबरोबरच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या विकासात अन्नछत्र मंडळामुळे भर पडत असल्याचे यावेळी ना.चंद्रकांत पाटील म्हणाले.

यानंतर ना.चंद्रकांत पाटील यांनी न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर व श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे श्रींचे दर्शन घेतले.

यावेळी न्यासाचे मोहन डांगरे, राहूल डांगरे, मल्लिनाथ स्वामी, महेश हिंडोळे, प्रदिप पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्विय सहायक धनंजय गाढवे, मल्लिकार्जुन आळगी, लखन झंपले, मनोज निकम, अरविंद शिंदे, दत्ता माने, बाळासाहेब कुलकर्णी-देसाई-बबलादकर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, आप्पा हंचाटे, पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी, रवी वाघमोडे, बालाजी कटारे, सचिन कलबुर्गी,निखील पाटील, गोटू माने, गोविंदराव शिंदे, सरफराज शेख, मैनुद्दीन कोरबू, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, प्रसाद हुल्ले, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, , अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, भाग्येश बंडू चुंगीकर, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.