स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासा इतकेच वेळेचे व्यवस्थापन,वाचन,स्वयंअध्ययन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे — सुनिल टाकळे (उपजिल्हाधिकारी )
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. न चुकता मतदान केलेच पाहिजे. जनहिताचे शासन निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जात-पात-धर्म तसेच इतर प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे.-- विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासा इतकेच वेळेचे व्यवस्थापन,वाचन,स्वयंअध्ययन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे — सुनिल टाकळे (उपजिल्हाधिकारी )

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. न चुकता मतदान केलेच पाहिजे. जनहिताचे शासन निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जात-पात-धर्म तसेच इतर प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे.– विनायक मगर तहसीलदार अक्कलकोट

अक्कलकोट, दि. २८-
स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्यातील एका-एका गुणाचे महत्त्व दाखवून देणारी असते. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासा इतकेच वेळेचे व्यवस्थापन, वाचन, स्वयंअध्ययन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट तालुक्यातील आळगी गावचे सुपुत्र, स्पर्धा परीक्षेत यश मिळवून उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घालणारे सुनिल टाकळे यांनी केले.

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी
महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थी सुनिल टाकळे यांचा यथोचित सन्मान, मतदान जनजागृती व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात टाकळे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुनर्वसन विभागातील उपजिल्हाधिकारी
सोपान टोंपे, अक्कलकोटचे नुतन तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार विकास पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवितोट, संयोजक डॉ. अशोक माळगे उपस्थित होते.

सुनील टाकळे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये शिकत असताना स्पर्धा परीक्षेची तयारीला सुरुवात करावी. पाचवीच्या स्कॉलरशिप पासून सर्व स्पर्धा परीक्षा देण्यास तयारी करावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बी प्लॅन सुद्धा तयार ठेवावी. कारण स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही तर आपल्याकडे जगण्याची साधन असणे गरजेचे आहे. मी स्वतः कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता स्वयं अध्ययनाद्वारे वरील स्पर्धेच्या परीक्षा उत्तीर्ण झालो असल्याचे टाकळे यांनी बोलताना सांगितले.

तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोम्पे यांनी मतदार जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील तरुण मुलांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यास आव्हान केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आडवितोट यांनी ग्रामीण भागातून राज्यसेवा परीक्षेत पास होणारे संख्या कमी आहे. सुनील टाकळे यांनी हे यश मिळवून आपल्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी/ विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. अशोक माळगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दयानंद कोरे यांनी केले. आभार प्रा. सिध्दाराम पाटील यांनी केले.
चौकट —
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. न चुकता मतदान केलेच पाहिजे. जनहिताचे शासन निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जात-पात-धर्म तसेच इतर प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे. मतदार जागृतीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबात व परिसरात जागृती करावी.
– विनायक मगर
तहसीलदार अक्कलकोट