अक्कलकोट विजेचा लपंडाव नागरिक हैराण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उपअभियंता महावितरण अक्कलकोट यांचे प्रतिनिधि कुमारी शेटे मॅडम यांना निवेदन
*वेळेवर लाईट ही नाही व अक्कलकोट शहराला वेळेवर पाणीही नाही येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जनता जाब विचारेल का?*

*वेळेवर लाईट ही नाही व अक्कलकोट शहराला वेळेवर पाणीही नाही येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला जनता जाब विचारेल का?*

अक्कलकोट दिनांक ०५/०४/२०२४

अक्कलकोट विजेचा लपंडाव नागरिक हैराण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने उपअभियंता महावितरण अक्कलकोट यांचे प्रतिनिधि कुमारी शेटे मॅडम यांना निवेदन देण्यात आले

*अक्कलकोट शहराला 24 तास वीज पुरवठा करण्याबाबत* सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तसेच उन्हाचा पारा दिवसेंदिवस अधिकच तीवर होत चाललेला आहे त्यामुळे उष्मघातेच रुग्ण वाढत आहेत त्याचे शहरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्यामुळे आपल्या महावितरणाचे वीज पुरवठा खंडित न करता 24 तास दिवस असो किंवा रात्र असो कायमस्वरूपी वीज पुरवठा अखंडित राहीला पाहिजे की जेणेकरून सर्व शेरवाशीयांना या उन्हाचा तीव्रते पासून वाचण्यासाठी निदान घरांमध्ये दुकानांमध्ये किंवा अन्य ठिकाणी पंखे कुलर ए सी चालू ठेवण्याकरिता वीज पुरवठा चालू पाहिजे अन्यथा अंगाची लाहीलाही होऊन उष्माघाताचे जीवित हानी होण्याची शक्यता आहे या बाबीचा गंभीर्याने विचार करून अक्कलकोट शहराला 24 तास वीज पुरवठा करण्यात यावे असे निवेदन द्वारे विनंती करण्यात आली आहे यावेळी रिपाइं शहर अध्यक्ष अजय मुकणार, सरचिटणीस शुभम मडिखांबे,दशरथ मडिखांबे,आकाश मडिखांबे,भीम मडिखांबे आदी उपस्थित होते

*एकीकडे शासन वारंवार सांगत आहे घराच्या बाहेर पडू नका चाळीस-पंचेचाळीस डिग्री तापमान असल्यामुळे प्रत्येकाने आपापले काळजी घ्यावी असे शासनाने वारंवार नागरिकांना टीव्ही प्रसार माध्यमातून आव्हान करत आहे तरी अक्कलकोट महावितरण कंपनी याचे गांभीरपूर्वक विचार करत नाही याची खंत वाटते असे मत रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी व्यक्त केले*
