गावगाथा

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा गेल्या ६ महिन्यापासून पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात बुधवार दि. २२ मे रोजी दाखल झाली असून उत्स्फूर्त मोठ्या भक्ती भावाने स्वागत

पालखी परिक्रमा 2024

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा गेल्या ६ महिन्यापासून पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह  विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात बुधवार दि. २२ मे रोजी दाखल झाली असून उत्स्फूर्त मोठ्या भक्ती भावाने स्वागत

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २७ वे वर्ष असून, गेल्या ६ महिन्यापासून पालखी पादुका महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह आता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात बुधवार दि. २२ मे रोजी दाखल झाली असून, त्या ठिकाणी उत्स्फूर्त मोठ्या भक्ती भावाने स्वागत करण्यात आले आहे.*

पुसद मुक्कामा नंतर नांदेड, परभणी, बीड, अहिल्यादेवीनगर (अ.नगर), पुणे या जिल्ह्य नंतर दि.१ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, दिनांक १२ जून २०२४ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार असल्याचे माहिती पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले यांनी दिली आहे.

न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येत नांही आशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत.

श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतत्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे.

श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छानेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्रतर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक, आपदग्रस्तांना मदत व शहरातील दिव्यांग, निराधार लोकांना समर्थ महाप्रसाद सेवा, कुस्तीगरांसाठी खुराक, आरोग्य विषयक इतर विविध कार्याक्रम राबविले जातात, तसेच शासनाच्या विविध उपक्रमांनासह राष्ट्रीय कार्यक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button