गावगाथा

Lekh | लेख : पहिलीचा वर्ग म्हणजे दुसरा स्वर्ग….! (लेखक : गुणवंत खोसे, जिल्हा परिषद शिक्षक, नाविंदगी)

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

     ऋग्वेदा नुसार स्वर्ग हे देवांचे निवासस्थान आहे. अथर्व वेदा नुसार स्वर्गात खूप सुख आहे. उपनिषदा नुसार स्वर्गात कसलेही भय नाही. स्वर्ग हा पृथ्वीच्या वर म्हणजे आकाशात वसलेला आहे असे मानतात. परंतु स्वर्ग म्हणजे नक्की काय आहे? तो कुठे आहे? याबाबत कोणी आपणाला खात्रीने माहिती देईल का? तर त्याचे उत्तर असेल नाही. कारण आतापर्यंत कोणी असा झाला नाही की तो स्वर्गात जाऊन परत आपल्यात आला आहे. परंतु मी आपणाला निरीक्षण शक्तीच्या आधारे, अध्यात्मिक दृष्टिकोनाच्या आधारे आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं! या उक्तीच्या आधारे खात्रीने म्हणेन की इयत्ता पहिलीचा वर्ग म्हणजे जणू काही दुसरा स्वर्ग!!

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

     काहीजण म्हणतात स्वर्ग आकाशात असतो, काहीजण म्हणतात कोकण म्हणजे स्वर्ग, काहीजण म्हणतात किल्ले रायगड म्हणजे स्वर्ग, काहीजण म्हणतात जन्मगाव म्हणजे स्वर्ग. काहीजण म्हणतात पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे स्वित्झर्लंड. पण तुम्ही कधी प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात गेलात का? कारण तुमच्या मनामध्ये स्वर्गाबाबतच्या ज्या काही कल्पना आहेत त्या सर्व कल्पना पहिलीच्या वर्गात अनुभवायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ काय तर इयत्ता पहिलीचा वर्ग म्हणजे जणू काही दुसरा स्वर्ग!!

HTML img Tag Simply Easy Learning    

 

     जोधा अकबर या हिंदी चित्रपटातील उत्कृष्ट संवादानुसार स्वर्ग म्हणजे काय? याचं खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. फरिश्तो से पूछा गया, जन्नत क्या है? उन्होने जवाब दिया, “जिस दिल में मोहब्बत होती है, उसे जन्नत कहते है।” नेमकं याच संवादानुसार इयत्ता पहिलीतल्या प्रत्येक मुला – मुलीचं हृदय प्रेमाने भरलेले असते. त्यांच्या मनामध्ये आणि डोळ्यांमध्ये निरागस भाव असतो. त्यांच्या हृदयाचा प्रत्येक कोपरा सकारात्मक विचाराने तुडुंब भरलेला असतो. पावलो-पावली त्यांच्या डोळ्यांना या सृष्टी मध्ये प्रेम आणि प्रेमच दिसते. तर मग इयत्ता पहिलीचा वर्ग म्हणजे खरोखरच दुसरा स्वर्ग.

 

     “गाढवाचं लग्न” या प्रसिद्ध मराठी चित्रपटातील सावळा ज्यावेळेस बुवाबरोबर स्वर्गात जातो त्यावेळेस तो स्वर्गातील अप्सरा पाहून जसं आश्चर्यचिकित होतो तसं तुम्ही इयत्ता पहिलीच्या वर्गात गेल्यानंतर आप्सरेपेक्षा सरस असलेल्या त्या नटलेल्या मुली, त्या रागीट मुली, त्या नखरेबाज मुली, प्रचंड ऊर्जा मनामध्ये आणि शरीरामध्ये असलेल्या त्या ऊर्जादायक आणि प्रेरणादायक मुली पाहिल्या की असे भासेल की इयत्ता पहिलीचा वर्ग म्हणजे जणू काही दुसरा स्वर्ग!

 

     वारकरी पंढरपूरला त्यांचा स्वर्ग समजत असतील, शेतकरी शेतीला त्यांचा स्वर्ग समजत असतील, दुकानदार त्यांच्या दुकानाला स्वर्ग समजत असतील, गावकरी गावातल्या मंदिराला स्वर्ग समजत असतील परंतु जिथे जिता – जागता, जिवंत हाडामासाचा बोलका स्वर्ग पाहिला मिळतो तो म्हणजे शाळेतला इयत्ता पहिलीचा वर्ग. तुम्ही कधी पहिलीच्या वर्ग मध्ये गेलात आणि समजा तुम्ही आजारी असाल तर तुम्ही तुमचा सर्व आजार विसरून जाता. तुम्ही दुःखी, कष्टी असाल तर तुम्हाला तुमच्या सगळ्या दुःखाचा विसर पडेल. एकंदर काय तर तुम्ही जेव्हा शाळेतल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात जाता तेव्हा तुम्ही सर्व जग विसरता. सर्व जग विसरवायची ताकद इयत्ता पहिलीतल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे म्हणजे एवढा आनंद, एवढी ऊर्जा हे पहिलीचे विद्यार्थी पाहून आपणाला मिळते. एकंदर काय तर इयत्ता पहिली चा वर्ग म्हणजे दुसरा स्वर्ग.

 

     हिंदू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदऱ्या होत्या. त्यानुसार आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या (InformationTechnology) युगात पहिलीतल्या मुली शाळेच्या दरबारात नृत्य गायन करणाऱ्या नृत्यांगनापेक्षा सुंदर तर आहेतच पण त्याचबरोबर उत्कृष्ट अध्ययनार्थी, उत्तम ज्ञानार्थी, कुशल परीक्षार्थी, खिलाडू वृत्तीच्या खेळाडू, गान कोकिळा लता मंगेशकर सारख्या गायिका, 1986 साली दक्षिण कोरियाच्या सोल इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 4 सुवर्णपदकं मिळवलेल्या पी टी उषा सारख्या उत्कृष्ट धावक, सलग तीन वेळा भारताच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या उत्कृष्ट राजकारणी सुद्धा आहेत त्यांच्याशिवाय घरात आणि शाळेत काडी सुद्धा हलत नाही. 

 

     इयत्ता पहिलीचा वर्ग म्हणजे स्वर्ग कारण पहिलीतला प्रत्येक मुलगा आणि मुलगी म्हणजे वरिष्ठांच्या प्रति आदरभाव आणि कनिष्ठांच्या प्रति करुणा भाव बाळगणारा, वेद वाचण्यापेक्षा दुसऱ्याच्या वेदना वाचणारा, मुक्या प्राण्यावर आणि पशुपक्षावर स्वतःच्या बहिण – भावा इतकं आणि आई-वडील इतकं प्रेम करणारा, कोणत्याही बाबतीत दुसऱ्याला निस्वार्थ सेवा देणारा, कुठल्याही प्रसंगी साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ दिसणारे आणि वागणारे मुलं म्हणजे इयत्ता पहिलीतले मुलं. आता तुम्ही थोडसं चिंतन करा की इयत्ता पहिली चा वर्ग म्हणजे स्वर्ग नाही का?

 

     पहिलीचा वर्ग म्हणजे आपल्या आयुष्यात शिक्षणाच्या यशोगाथेचा श्री गणेशा असतो.पहिलीच्या वर्गातील वर्षभरातील गमती जमती आयुष्यभर गोड स्मृती बनत असतात.एवढेच नाही तर आयुष्यभर सोबत देतील असे मित्र याच वर्गापासून मिळत असतात. अशा या गोड स्मृतीचा कायम ठेवा असणार्या इयत्ता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी त्या वर्गासाठी शिकवित असलेल्या शिक्षकांबद्दल आयुष्यभर नेहमी एक नम्र, विनय भाव मनामध्ये ठेवत असतात. अशी ही उमलती फुल म्हणजे आनंदाचा ठेवा असतात.

 

     आता आपल्या मनामध्ये साहजिकच एक प्रश्न निर्माण झाला असेल कि जर स्वर्गाची देखभाल करणारे देव असतील तर पहिलीच्या वर्गाची देखभाल करणारे वर्गशिक्षक देव ठरतील का? जर तुमचे उत्तर होय असेल तर इयत्ता पहिलीच्या वर्गाचे वर्गशिक्षक खरंच You are great !

 

         -गुणवंत सौदागर खोसे ,प्राथमिक शिक्षक जि प प्रा मराठी शाळा नाविंदगी ता. अक्कलकोट जि.सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button