शिवशरणप्पा बाळकृष्ण सुरवसे यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुणीजन गौरव पुरस्कार
पुरस्कार

शिवशरणप्पा बाळकृष्ण सुरवसे यांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुणीजन गौरव पुरस्कार ….


अक्कलकोट तालुक्यात स्वतः खर्च करून प्रत्येक गावी जाऊन नाभिक समाजाच्या प्रत्येकाच्या घरी दुकानी व वाड्यावस्त्यांवर जाऊ जनगणना करणे , सर्व समाज बांधवांना एकत्र करून समाज बांधवांच्या अडी- अडचणी दूर करणे संघटनेचे महत्त्व समजावून सांगणे . प्रत्येक गावात अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवड करून पत्र देणे.
तालुक्यातील सर्व गावातील समाज बांधवांची महिती गोळा करून एका हजार जनगणना पुस्तक छापून वागदरी येथे एक हजार समाज बांधवांच्या उपस्थित अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
तालुक्यातील गरीब सलुन दुकानदारांना जिल्हा सेस फंडातून 25 सलुन खुर्ची मिळबून दिले ,तसेच पंचायत समिती कडून पिको- फॉल मशीन सुध्दा मिळवून दिले.
कोरोना काळात तालुक्यात समाज बांधवांना 300 किट ( किराणा मालाचे ) वाटप करण्यात आले.
दहिटणे गावातील श्री गजानन काळे यांचे घराला आग लागून घरातील सर्व वस्तू जळाले होते, त्या जळीत कुटुंब 27000 हजार रुपये व किराणा माल मदत मिळवून दिले. श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वागदरी व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष निवड नंतर शाळेत प्रत्येक विद्यार्थांना वही-पेन वाटप केले. मित्र मंडळींकडून चौदा हजार रुपयेचे क्रीडा साहित्य दिले.
24000 हजार रुपयाचे मित्र- मंडळींकडून पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले,
वाढदिवसाच्या निमित्ताने मित्र- मंडळींकडून इडली बनवण्यासाठी मोठा मिस्कर, कुकर मोठे भांडं,मिळवून दिले. शाळेस देऊन आठवड्यात एक दिवस विद्यार्थ्यांना इडली बनवून खाऊ घालण्यात येते.
भारतीय स्टेट बँकेकडून पाठ पुरावा करुन दोन संगणक संच मिळवून दिले . जिल्हा परिषद व ग्रामपंचायत कडून सहा लाख पंचवीस हजार रुपयांचे शाळेत काम करुन घेतले
प्रत्येक वर्गात एलईडी ट्यूब सिलिंग फॅन बसविले.
लोकसहभागातून 43 इंची एलईडी स्मार्ट टीव्ही शाळेत बसवले व प्रथमोपचार साहित्य दिले,पाठ पुरावा करुन एम के फोडेशन कडून वही वाटप केले लोकसहभागातून शाळेतील वर्गातल्या खिडकीना लोखंडी जाळी बसवले तसेच लाईट फिटिग करण्यात आले शाळेसाठी
शिक्षक मागणीसाठी प्राणांतिक उपोषण करून तीन शिक्षक मिळुन दिले
वागदरी आरोग्य केंद्रात लोकसहभागातून दोन मोठे चटई व पॉलीश फरशी पुसण्यासाठी मशिन मिळवून दिले.
तालुक्यातील समाज बांधवांसाठी व.
वागदरी गावासाठी पाठ पुरावा करून. असे अनेक कामे तालुक्यात व वागदरी गावात काम केले आहे, करत आहे यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 37 वर्धापन दिनानिमित्त 11 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 दरम्यान धर्म संकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या 25 वर्षीपासून आयोजित करण्यात येत आहे 19 जुलै 2024 शुक्रवार संध्याकाळ महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री शिवशरणप्पा बाळकृष्ण सुरवसे यांना गुणीजन गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे
