Pawana Dam : पवना धरणाची शतकाकडे वाटचाल ; संध्याकाळी ७ वाजल्यापासून ५००० क्यूसेकने विसर्ग सुरू

निगडी (प्रतिनिधी): पवना धरण शतकाकडे वाटचाल करत असून सध्यस्थितीत 92 टक्के भरले आहे. धरण परिसरात पावसाचा जोर सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार आहे. सायंकाळी सात वाजल्यापासून 5000 क्युसेकने विसर्ग नदी पात्रात करण्यात येणार आहे.

धरणाच्या सांडव्यावरून 1800 क्युसेक तर जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक असा एकुण 3200 क्युसेक इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू आहे.पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असल्याने पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज सायंकाळी 7 वाजल्यापासून सांडव्यावरून विसर्ग वाढवून 3600 क्युसेक करण्यात येणार आहे. नदी पात्रामध्ये एकूण 5000 क्युसेक (3600 +1400 = 5000 ) इतक्या क्षमतेने विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व वेळेनुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.

पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. असे आवाहन करण्यात आले आहे.
