Akkalkot Good News: आमदार कल्याणशेट्टींनी जनतेला दिलेला शब्द पाळला ; उजनीचं पाणी काही तासांत कुरनूर धरणात पोहचणार

अक्कलकोट (प्रतिनिधी): आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गत विधानसभा निवडणुकीत उजनीचे पाणी अक्कलकोट तालुक्यांना मिळवून देऊ अशी ग्वाही दिल्याप्रमाणे अखेर उजनीचे पाणी हरणा नदीत पोहोचल्याने येत्या दोन दिवसात कुरनूर धरणात पोहोचणार असल्याने अक्कलकोट तालुका वासियातून समाधान व्यक्त होत आहे.


दरम्यान दर्गनहळी कुंडातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध तलाव भरून घेण्यात आले. दिनांक 1 सप्टेंबर नंतर जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार दर्गनहळली वितरण कुंडातून नदीकडे उजनी धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. एक टीएमसी पाण्यातच एकरूप उपसा सिंचन योजनेतील सर्व तलावासह भरून होणार आहे. त्यामुळे एक टीएमसी पेक्षा कमी पाणी धरणात सोडण्यात येणार आहे.


कुरनूर धरणाची पाणी साठवून क्षमता 0.82 टीएमसी असून या खालील सिंचन क्षेत्र दहा हजार एकशे दहा हेक्टर असून सध्याचे स्थिती पाहता 36 टक्के होऊन अधिक पाणीसाठा उजनी धरणात आहे धरणाच्या खालील बंधाऱ्यची एकूण आठ आठ बंधारे असून यावर 51 गावांची लिस्ट आहे धरणाला नऊ दरवाजे असून बोलणे हरणा नदीच्या संगमावर धरण असून उजनी ते करून धरण 226 किलोमीटर अंतर पार करून पाणी करून धरणात पोहोचणार आहे.
पाण्याच्या प्रवाहानुसार कुरुल धरणात पाणी येत्या दोन दिवसात पोहोचणार आहे.
उजनीचे पाणी अक्कलकोट तालुक्याला मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा संपणार असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गत विधानसभा निवडणुकीत दिलेली वचनपूर्तीच म्हणावी लागणार आहे.
गेली वीस वर्षे तालुक्याचे राजकारणात उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कुरनूर धरणाभोवती फिरत होते. या कामे राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या पाण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्याने सदरचे यश मिळाले आहे.
एकरूप प्रकल्पाचे भूमिपूजन भूमिपूजन दर्गनहळी येथे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते गेल्या 30 वर्षापासून शासकीय निधी उपलब्ध नसणे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता आणि महाराष्ट्रातील सत्तांतर आदी अनेक कारणामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प रखडला होता. सन 2021 मध्ये एकरूख सिंचन योजनेची चाचणी घेण्यात आली होती दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना उजणीचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण अस्त्र उगारले. तीस वर्षांपूर्वी या प्रकल्पाचा खर्च 24 कोटी इतका होता शासनाच्या वेळ काढून पणामुळे या योजनेचा खर्च साधारणपणे 250 कोटीच्या घरात गेला आहे.
अक्कलकोट व आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक आमदार बदलले पाणी प्रश्न मिटला नव्हता तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी या योजनेवर मते मिळविली सध्या समाज माध्यमातून अक्कलककोट दक्षिण तालुक्यातील गावांसाठी एकरूप योजनेची पाणी येण्याचे पाणी कोणी आणले यावरून वाक्य युद्ध सुरू आहे एकरूप सिंचन योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पाण्यामुळे तालुक्यातील बागायती क्षेत्र क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती दिलासात्मक होऊन जीवनमान उंचावणार आहे.
याकरिता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेले प्रयत्न फलदायी ठरलेले असून तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत उजनीचे पाणी पोहचणार आहे.
गेल्या पाच वर्षात राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या योजनेला भरीव निधी मिळविल्याने सदरची योजना पूर्ण होऊन अखेर उजनीचे पाणी अक्कलकोट तालुक्यास मिळण्यास मोठी मदत झाली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील 21 आणि अक्कलकोट तालुक्यातील 51 गावे अशा 72 गावे उजनीच्या पाण्यापासून वंचित होती या गावातील एकूण 17310 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी एकरूप उपसा सिंचन योजना पूर्ण होणे काळाची गरज होती. दरम्यान सन 2019 सालच्या अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत काही गावांनी या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घ्यावी लागली होती. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने सदरची योजना पूर्ण होण्यास मोठी मदत झाली आहे. एकरूप योजना पूर्ण होऊनही उजनी डावा कालवा शाखेतील सोडलेले पाणी पुढे कारंबा शाखेनंतर एकरूप तलावापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता. उजनी धरणाची निर्मिती होऊन 45 वर्षे झाली अक्कलकोट तालुक्याला हक्काचे पाणी मिळणार असून यामुळे हरितक्रांती धवलक्रांती होऊन अर्थक्रांतीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नामुळे योगदान मिळणार आहे.