Akkalkot: “न्यासाच्या” विविध विकास कामांमुळे अक्कलकोटच्या वैभवात भर -वृषालीराजे भोसले

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विविध क्षेत्रातील अफाट कार्य व परिसरातील विकासाने श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडत असल्याचे मनोगत छत्रपती शिवाजीराजे भोसले (सातारा) यांच्या सुकन्या वृशालीराजे शिवाजीराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.


त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आल्या असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.


याप्रसंगी सोलापूरचे इंद्रजीत पवार, ओम पवार व मंडळाचे सचिव शामराव मोरे, गणेश भोसले, मनोज निकम, अभियंता अमित थोरात, पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, निखील पाटील, प्रविण घाडगे, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.