Solapur: भारीच की…! एकरी इतक्या टन ऊस उत्पादन घेतलेल्या शरणप्पा माळगेंचा जयहिंद कारखान्याकडून सत्कार

सोलापूर (प्रतिनिधी): आळगे गावातील प्रगतशील शेतकरी शरणप्पा माळगे यांचा जयहिंद साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. माळगे यांनी २६५ जातीच्या ऊसातून प्रति एकरी तब्बल ८० टन ऊसाचे उत्पादन घेतले. त्यामुळे त्यांचा कारखान्याचे शेती अधिकारी राजशेखर जेऊरे, उप शेती अधिकारी घोगरे, ओशियर मंत्रजात तोरणगी यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.


माळगे यांच्या एक ऊसाला तब्बल ५२ कांड्या तर एकरी ८० पेक्षा जास्त टन ऊस उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी, रुक्ममोद्दीन कुमठे, कमलसाहेब मुल्ला, सुरेश पाटील, चिकिरप्पा माळगे, उपसरपंच रियाज मुल्ला, सद्दाम पटेल,हब्बू कुमठे, इशुपल्ली कुमठे, श्री . कोळी, सुधाकर कोळी, प्रगतशील शेतकरी काशिनाथ सोडगी व शाहुसेन कुमठे, सिद्धाराम कोळी आदी उपस्थित होते.
