Akkalkot: समर्थांची कृपासावली हे जीवनातील सर्वात मोठे भाग्य – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

अक्कलकोट (प्रतिनिधी): ब्रम्हांडनायक दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांची कृपासावली हेच आमच्या कुटुंबीयांच्या जीवनाचे सर्वात मोठे भाग्य असल्याचे विचार भाजपा नेते तथा माढा मतदारसंघातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मांडले.

ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी निंबाळकर बोलत होते. पुढे बोलताना निंबाळकर यांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीभावातून लाभलेल्या जीवनाचे कर्म समाजसेवा व जनसेवेकरीता
करण्याचे काम स्वामींच्या कृपेने माझ्या हातून घडत असल्याचे मनोगतही व्यक्त केले.

यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष फुटाणे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, अमर पाटील, संजय पवार, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, प्रफुल जाधव, श्रीकांत मलवे आदि उपस्थित होते.

फोटो ओळ – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
