*कुरनूर धरणातून खालच्या भागात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरु…*
*नगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी हंगामातील पाण्याची गरज*

*कुरनूर धरणातून खालच्या भागात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरु…*

*नगरपालिकेला पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी हंगामातील पाण्याची गरज*

*सांगवी बु जालशयातून पाणी उपसा नगरपालिकेला परवडणारे, सांगवी पर्यंत पाणी सोडणार…*

*येत्या बुधवार पर्यंत धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन*

✒️ *प्रविणकुमार बाबर / सांगवी*

यंदाचा उन्हाळा इतका कडक आहे की, फेब्रुवारी मध्येच बोर, हातपप, शेवटची घटका मोजत असून, नदी, ओढे, तर कोरडे ठाकच पडलेले आहेत. अक्कलकोट तालुक्याला वरदायनी ठरलेल्या कुरनूर धरणात सध्या 28% इतका पाणी साठा शिल्लक असून, 20% पाणी साठा हा धरणामध्ये मृत साठ्यात राहतो. तर 8 % टक्के पाणी खालच्या भागात सोडण्याचे नियोजन ठरले असल्याची माहिती बोरी मध्यम प्रकल्पच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.
अक्कलकोट ला सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई भासत असून, त्याच पार्श्वभूमीवर धरणातून 8% पाणी सोडण्याचे नियोजन झाले असून, हे 8% पाणी सांगवी बु जालशयापर्यंत अथवा कुठपर्यंत जाईल तिथं पर्यंत्त पाणी सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. अक्कलकोट नगरपालिकेने पाणीपट्टी (कर) भरल्यावर लगेचच पाणी सांगवी बु जलशयापर्यंत सोडणार असून, तिथून पंपगृह च्या द्वारे अक्कलकोट ला पाणी पुरवठा होणार आहे. धरणातून खालच्या भागात नगरपालिका, यांना पिण्यासाठी पाणी आवश्यक असल्याने उन्हाळी हंगाम 2 रे आवर्तन सोडण्याची तातडीची गरज असून, तालुक्यातील लोकप्रतिनिधी, तसेच बोरी मध्यम प्रकल्पच्या अधिकाऱ्यामध्ये कुरनूर धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात बैठक झाली असून, उन्हाळ्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची हालचाली सुरु असून, येत्या बुधवारी पर्यंत पाणी सांगवी बु जलशयापर्यंत अथवा 8% पाणी कुठपर्यंत जाईल तिथं पर्यंत सोडणार असल्याची माहिती आहे.
——————————————- —————————-