कोणत्याही अपेक्षेशिवाय कर्तव्याप्रती जीवन समर्पण केल्याने भगवंताच्या प्रचितीची व्यापक अनुभूती – ह.भ.प.कृष्णा बुवा माळकर
श्री.स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजीत वटवृक्ष मंदीरात धर्मसंकीर्तन महोत्सवात केले निरूपण
(अ.कोट.श्रीशैल गवंडी, दि.१३/०४/२०२५)
८४ लक्ष जन्म मरणाच्या फेऱ्यांतून मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर हा जन्म सार्थकी लावण्याकरीता या जन्मात मनुष्याने भगवंताचे स्मरण ठेवून कोणत्याही अपेक्षेशिवाय कर्तव्याप्रती जीवन समर्पण केल्याने भगवंताच्या प्रचितीची व्यापक अनुभूती नक्कीच येते असे निरूपण डोंबीवली येथील ह.भ.प.कृष्णा बुवा माळकर यांनी केले. आज श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवाची सुरुवात येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कै.कल्याणराव इंगळे सभामंडपात मोठया भक्ती भावात झाली. या धर्मसंकीर्तन महोत्सवात श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळी यांच्या वतीने आयोजीत
नारदीय कीर्तन सेवेच्या माध्यमातून आज पहिले पुष्प गुंफले गेले. या प्रसंगी डोंबीवली येथील ह.भ.प. कृष्णा बुवा माळकर हे निरूपण करताना बोलत होते. प्रारंभी ह.भ.प.कृष्णा बुवा माळकर व साथीदारांचा तसेच सोमदत्त आसोलकर दांम्पत्याचा प्रथमेश इंगळे यांच्या उपस्थितीत दिंडोरी प्रणित श्री.स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवाकेंद्राचे प्रमुख गुरुमाऊली प.पु.अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव तथा त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे प्रमुख चंद्रकांत मोरे व मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कीर्तनसेवेच्या पुर्व रंगात
कब स्मरोगे राम या ओवीतून भक्तीमय उदाहरण देताना आपण राम नाम केव्हा घेणार… लहाणपण खेळण्यात गेले. तारुण्य हौसमोज करण्यात गेले. म्हतारपण सुरु झाले नामस्मरण करू शकत नाही. मग केव्हा घेणार राम नाम…जेव्हा सर्व गोष्टी अनुकूल आहेत तेव्हा राम नाम घ्यायला सुरुवात करा… कारण हा देह केव्हा संपेल याची कोणास खात्री देता येत नाही, तरी राम नाम घ्या.. राम नाम घेतल्यामुळे त्रिजत महाराज.. फक्त राम नामामुळे कसे जीवन मुक्त झाले आणि… परमार्थिक आणि सांसारिक सुख मिळवून फक्त राम नाम घेतल्यामुळे कसे तरुन गेले आणि जीवन राममय कसे झाले. आपले कर्तव्य म्हणजे प्रेम आहे आणि कर्तव्याप्रती अपेक्षा म्हणजे स्वार्थ आहे. भगवंताला प्रिय कर्म म्हणजे मुखी भगवंत नाम घेणे आहे. निस्वार्थ भावनेने हाताने टाळी मुखाने नाम म्हणजे नाम घेण्या कर्तव्या प्रती प्रेम आहे.
भगवंत चिंतनासाठी नामजपाचा ध्यास अंगी असावा लागतो मग या प्रेमाची उत्पत्ती आपोआप होते असे उतरंगात निरूपण केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ओंकार पाठक यांनी धर्मसंकीर्तन महोत्सवाचा संक्षीप्त स्वरुपात इतिहास सांगीतला. तसेच कार्यक्रमाचे पारंपारीक सुत्रसंचालनही केले. यावेळी बोलताना त्र्यंबकेश्वर गुरुपीठाचे पीठाधीश चंद्रकांत दादा मोरे यांनी सद्गुरु चैतन्यस्वरूप अण्णा लिमये यांच्या श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार आणि प्रसार या कार्याअंतर्गत पदयात्रा, जप, नामस्मरण, मानसपुजा, कीर्तन, भजन, गायन या सेवेत, अध्यात्मिक उन्नती सोबत स्वामीसेवकांसाठी भक्ती सहवासाचे हक्काचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून अक्कलकोट मासिक कीर्तन सेवेचे आयोजन येथील”श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वामी हो” गृप आणि “डोंबिवली-बदलापूर स्वामीभक्त मंडळी” चे सोमदत्त आसोलकर करत आलेले आहेत. सोमदत्त आसोलकर यांन पुर्व जन्माचे काहीतरी ऋणानुबंध आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद असल्यानेच ते सर्व अक्कलकोट मासिक कीर्तन सेवेत सामील होत आहोत. सर्वांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे हे सेवा यज्ञकुंड गेले १२३ महिने सतत धगधगत आहे ही बाब राज्यभरातील स्वामी भक्तांसाठी उल्लेखनीय असल्याचे मनोगत व्यक्त केले. या कीर्तन सेवेत ह.भ.प.कृष्णा बुवा माळकर यांना तबल्यावर सुनिल शेलार यांनी तर हार्मोनियमवर मयूर स्वामी उत्तम साथसंगत केली. या सर्व कार्यक्रमांसह या कीर्तन सेवेस श्रोत्यांनीही मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, डॉ.मल्लीनाथ बोधले, प्रकाश कासेगांवकर, ओंकार पाठक, मनोज जाधव, ज्ञानेश्वर भोसले, सोमदत्त आसोलकर, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, सागर गोंडाळ, लखन गवळी, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, रवीराव महिंद्रकर यांच्यासह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – धर्मसंकीर्तन महोत्सव व्यासपीठावर कीर्तन सेवा सादर करताना ह.भ.प.कृष्णा बुवा माळकर दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!