
अक्कलकोट येथील सी बी खेडगी महाविद्यालयात “सेवा हक्क दिन “आयोजन

अक्कलकोट –या कार्यक्रम अंतर्गत राज्यातील शेतकरी बांधव व विद्यार्थी वर्ग व ग्राहक बांधव, ग्रामीण व शहरी भागातील जनतेना मिळणारे शासकीय स्तरावरील विविध क्षेत्रातील सर्व सेवा आणि आर्थिक व सामाजिक लाभ पारदर्शीपणे गतिमानरित्या कार्यक्षमपणे विशिष्ट कालमर्यादेत मिळवून देण्यासाठी असलेला उत्तरदायित्व राज्यसेवा हक्क अधिनियम (Right to Service Act )२८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यसेवा हक्क अधिनियम पारित करण्यात आला. हे अधिनियम अंमलबजावणीस आज २८ एप्रिल २०२५ रोजी १० वर्षे पूर्ण होत असून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर ” सेवा हक्क दिन ” म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनानी घोषित केले आहे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीना सामाजिक शैक्षणिक आर्थिक भौगोलिक पर्यावरणीय न्याय मिळाला पाहिजे. तसेच सेवा हक्क दिनाचे महत्त्व, सेवेची उपयुक्तता, सेवा देण्यासाठी तत्पर असलेला सरकारी खाजगी शैक्षणिक सामाजिक स्तरावरील कार्यरत असलेले विविध विभाग व त्यांचे योगदान याबाबत अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले. तसेच त्यांनी आपल्या मनोगतामध्ये राज्यातील प्रत्येक व्यक्ती युवक नागरिक लाभार्थी यांनी आपल्याला सरकारकडून मिळत असलेली मूलभूत सेवा सुविधा ” आपली सेवा, आपले हक्क व आपले कर्तव्य ” याबाबत नेहमी जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या दिनाचे ब्रीद वाक्य “आपली सेवा व आपले कर्तव्य ” असा घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक प्रा. संजय कलशेट्टी हे होते. तर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूगोल विभागातील प्रा. डॉ. भैरप्पा कोणदे हे उपस्थित होते. त्यानी आपले विचार व्यक्त करताना महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळत असलेली सेवा व आपल्या हक्क याबाबत सतत जागृत असणे अत्यंत आवश्यक आहे.आणि
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. संजय कलशेट्टी यानी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राज्यातील प्रत्येक व्यक्ती सरकारकडून योग्य वेळेत आर्थिक, शैक्षणिक सामाजिक कृषी उद्योग सेवा आरोग्य पर्यावरण संबंधित विविध विभागातील सेवा तत्पर वेळेच्या आत मिळवण्यासाठी जागरूक रित्या प्रयत्नशील असणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका सौ सध्या इंगळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजन एन सी सी चे छात्र कुमारी कीर्ती बिराजदार कुमारी सोनाली क्षीरसागर व विद्यार्थी श्री सचिन जमादार श्री मंजुनाथ पुजारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी रोहन राठोड व संतोष शटगार यांनी केले. तर आभार विद्यार्थी श्री रेवणय्या मठपती यांनी मानले या कार्यक्रमांतर्गत उपस्थित सर्व मान्यवर प्राध्यापक वर्ग व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व एन सी सी विभागातील छात्र बंधू भगिनींना ” सेवा हक्क दिन ” निमित्त शपथ देण्यात आली.
