गावगाथा

स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – न्यायाधीश मनोज शर्मा

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर महेश इंगळे यांच्या हस्ते झालेल्या सत्काराप्रित्यर्थ बोलताना व्यक्त केले मनोगत.

स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – न्यायाधीश मनोज शर्मा

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर महेश इंगळे यांच्या हस्ते झालेल्या सत्काराप्रित्यर्थ बोलताना व्यक्त केले मनोगत.

(अक्कलकोट–श्रीशैल गवंडी)
स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांप्रमाणे माझ्या कुटूंबियांसह मलाही श्री. स्वामी समर्थांच्या जागृततेची व त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचिती आली आहे. यामुळे जीवन स्वामीमय झाले आहे. माझ्यासह अनेक भाविकांच्या जीवनात स्वामी भक्तीला अग्रस्थान असल्याने माझ्या सह तमाम स्वामी भक्तांच्या भक्तीतून स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय होत असल्याचे
मनोगत सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मनोज शर्मा यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायाधीश मनोज शर्मा व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी न्यायाधीश मनोज शर्मा बोलत होते. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, सोलापूरचे इंद्रजीत पवार, ओम पवार यासह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – न्यायाधीश मनोज शर्मा यांचा सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button