गावगाथा

वृक्षारोपण बरोबर वृक्ष संवर्धन काळाची गरज. —— प्राचार्य डॉ. संजय अस्वले

दिन विशेष

वृक्षारोपण बरोबर वृक्ष संवर्धन काळाची गरज. —— प्राचार्य डॉ. संजय अस्वले

(मुरुम प्रतिनीधी)

जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात १९७२ मध्ये स्टॉकहोम (स्वीडन) येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेपासून झाली. १९७३ पासून हा दिवस दरवर्षी संपूर्ण जगभर साजरा केला जातो. यानुसार आपण
दरवर्षी किमान एक झाड लावावे.
प्लास्टिक वापरणे टाळावे. पाण्याचा अपव्यय थांबवावा. पर्यावरण संरक्षणाविषयी इतरांमध्ये जागरूकता निर्माण करावी. वृक्षारोपण म्हणजे झाडे लावण्याची प्रक्रिया होय. ही एक पर्यावरण रक्षणाची महत्त्वाची क्रिया आहे, कारण झाडे आपल्याला प्राणवायू देतात, कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात आणि हवामानाचे संतुलन राखतात. झाडे हवेमधील प्रदूषक घटक कमी करतात.
पर्जन्यमान वाढवतात: झाडांमुळे जमिनीची आर्द्रता टिकून राहते. म्हणुन वृक्ष संवर्धन म्हणजे लावलेल्या झाडांची योग्य काळजी घेणे व त्यांचे संरक्षण करणे. झाडे लावणे महत्त्वाचे असले तरी, त्यांची वाढ होईपर्यंत त्यांची निगा राखणे अधिक महत्त्वाचे आहे. पर्यावरण दिन साजरा करताना वृक्षारोपण बरोबर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांनी केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा ग्रीन क्लब हरित सेना यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी संरक्षक जाळी उपक्रमाची सुरुवात महाविद्यालय परिसरात करण्यात आली. दरवर्षी महाविद्यालयात एक शिक्षक एक वृक्ष आणि एक विद्यार्थी एक वृक्ष या अभियानांतर्गत दत्तक वृक्ष योजना सुरू आहे. चालू शैक्षणिक वर्षाची 2025-26 सुरुवात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाने करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य अस्वले यांनी वृक्षारोपण हे आजच्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय देणारे प्रभावी साधन आहे, पण त्याचे खरे मूल्य तेव्हा समजते जेव्हा आपण त्याचे संवर्धन करतो. पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असे आव्हान केले
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी ए पिटले डॉ. बी के लबडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी ए शेळके डॉ. दामू बिराजदार, डॉ. ए एस पदमपल्ले, डॉ. डी बी ढोबळे, प्रा. काकनाळे, डॉ. पी डी पाटील, श्री अनिल तुंगी तुंगे,श्री भालेराव, श्री एस एस जगताप, श्री धनु पाटील या हरित सेना आणि ग्रीन क्लब सदस्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button