विद्यार्थ्यांनो स्पर्धा परीक्षेला सामोरे जा : मा. सिद्धाराम म्हेत्रे
समर्थ संस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार
सोलापूर : सध्या विद्यार्थ्यांचा इंजीनियरिंग व मेडिकलकडे जास्त ओढा दिसून येत आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. यामुळे देशाबरोबर समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. तसेच अधिकारी पदामुळे सन्मान देखील मिळतो असे प्रतिपादन माझी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.

समर्थ बहुउद्देशिय शिक्षण संस्था संचलित समर्थ कॅाम्प्युटर्स व टायपिंग इन्स्टिट्युटच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंतांचा, टायपिंग आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मंचावर दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानीय सचिव डॅा विजयकुमार उबाळे, सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री गजानन धरणे, जोडभावी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुरज मुलांणी, एसव्हीसीएस भवानी पेठचे प्राचार्य श्री राम ढाले, वीरशैव व्हिजन संस्थापक अध्यक्ष श्री राजशेखर बुरकुले, संस्थेचे संस्थापक गुरुशांत बिराजदार उपस्थित होते.

संस्थेच्या सत्कार समारंभाचे यंदाचे 18 वे वर्ष होते. यावेळी दयानंद महाविद्यालय , शेळगी, भवानी पेठ आणि दक्षिण सोलापूर मधील 100 विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सोलापुर परीसरातील दहावी, बारावीतील विद्यार्थी, पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी संस्थेचे कौतुक करत सर्व विद्यार्थांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप क्षीरसागर यांनी केले तर आभार गुरुशांत बिराजदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिवा शिवलिला बिराजदार, सुरेश बिराजदार, अकबर नदाफ, बसवराज जकापुरे, विश्वजीत शिर्के, सिद्राम जोडमोठे यांचे सहकार्य लाभले.
(फोटो ओळी : समर्थ संस्थेचे वतीने गुणवंताच्या सत्कार प्रसंगी सिद्धाराम म्हेत्रे, विजयकुमार उबाळे, गजानन धरणे, सुरज मुलाणी, राम ढाले, राजशेखर बुरकुले, गुरुशांत बिराजदार)
Back to top button
×
No WhatsApp Number Found!