विखे-पाटील घराण्यावर श्री स्वामी समर्थाची मोठी कृपा – राज्याचे कँबीनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
(अ.कोट,श्रीशैल गवंडी. दि.०६/०७/२०२५) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे. अलीकडील काळात स्वामी भक्तांची संख्या वाढत चालली आहे. या कारणाने येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत चालली असल्याचे / आपणास समजले आहे.
यामध्ये आमचा विखे-पाटील नाही. त्यामुळे अन्य स्वामी भक्तांप्रमाणे विखे-पाटील घराण्यावरही श्री स्वामी समर्थाची मोठी कृपा असल्याचे मनोगत राज्याचे कँबीनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास आज भेट देऊन अत्यंत विनम्रभावे मंदिर परिसराची पाहणी करत व मंदिरातील भाविकांसाठी असलेल्या सोयी सुविधांबद्दल जाणून घेऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कँबीनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी
राधाकृष्ण विखे-पाटील बोलत होते. पुढे बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वटवृक्ष मंदिरातील गर्दीच्या कालावधीतही मंदीर समितीचे वटवृक्ष मंदिरातील नियोजन उत्तम व शिस्तबद्ध असते. म्हणून स्वामी समर्थांवरील श्रद्धेय भक्ती भावनेने वटवृक्ष मंदिर समितीस आवश्यक ते सहकार्य करण्यास आपण नेहमी तयार असल्याचे मनोगतही राधाकृष्ण विखे-पाटील
यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, शहाजी भाऊ पवार, मिलन दादा कल्याणशेट्टी, व्ही.व्ही.पी.काँलेजचे अमोल नाना चव्हाण, मोतीराम राठोड, ननू कोरबू, बाळा शिंदे, केदार माळशेट्टी, अभिशेक लोकपूरे, अतिष पवार, सिध्दू माळी आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ – राज्याचे कँबीनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!