श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ धार्मिक कार्याबरोबर समाजकार्याचाही आदर्श — ना. भरतशेठ गोगावले
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळ हे धार्मिक कार्याबरोबरच श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारे कार्य करत असून, राज्याच्या धार्मिक क्षेत्रात नावाजलेला न्यास म्हणून ओळख मिळवली आहे, असे गौरवोद्गार राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे आले असता न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे यांच्या उपस्थितीत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे आणि माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी अक्कलकोट माजी नगरसेवक रईस टिनवाला, महेश साठे, अमर पाटील, बाबा पाटील, सुनील कटारे, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह सौरभ मोरे, अतिश पवार, वैभव मोरे, प्रवीण घाटगे, गोटू माने, शहाजी यादव, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, बाबुशा महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, सिद्धाराम कल्याणी, एस. के. स्वामी, महांतेश स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!