सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळेच एकसंघ भारताचे स्वप्न साकार झाले : मल्लिनाथ कल्याणशेट्टी
राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने जयंतीनिमित्त कार्यक्रम
अक्कलकोट :
सरदार वल्लभभाई पटेल यांनी राजनैतिक कौशल्य, दृढ निश्चय व शौर्याने ब्रिटिशकालीन संस्थाने भारतात विलीन केली, त्यामुळे एकसंघ भारत निर्माण करण्याचे स्वप्न साकार झाले, म्हणून त्यांच्या प्रेरणादायी कार्यापासून आदर्श घेऊन राज्यकर्त्यांनी देश व राज्य हितासाठी कठोर निर्णय घ्यावेत असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, प्रा विठ्ठल वाघमारे, संतोष वगाले, चेतन जाधव, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र चळवळीत बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केल्याबद्दल जनतेने त्यांना सरदार ही उपाधी दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातील 562 संस्थांनिक स्वतंत्रपणे राज्य करत होते. त्यामुळे देश एकत्रित ठेवण्याचा कठीण प्रश्न निर्माण झाला होता, हा जटिल प्रश्न सरदार पटेल यांनी चर्चेद्वारे सोडविला म्हणून ते भारतीय एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सौरभ भस्मे यांनी केले तर प्रा मनीषा शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमास प्रा हर्षदा गायकवाड, प्रा डॉ शितल झिंगाडे-भस्मे उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
विद्यार्थी व मान्यवरांनी घेतली एकतेची शपथ
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाचे सार्वभौमत्व आबादी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,अशी एकतेची शपथ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवरांनी घेतली
फोटो ओळ
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस अभिवादन करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!