बुद्धीचा अथांग सागर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे
जि.प.प्राथमिक मराठी शाळा वागदरी ता .अक्कलकोट जि .सोलापूर या शाळेत महामानव विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .

बुद्धीचा अथांग सागर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे
जि.प.प्राथमिक मराठी शाळा वागदरी ता .अक्कलकोट जि .सोलापूर या शाळेत महामानव विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाम बाबर होते .भारताचे भाग्यविधाते परमपूज्य डॉ .आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन शाम बनसोडे व मान्यवरांनी केले .महादेव सोनकवडे यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्याना माहिती सांगितली .जरी संकटाची काळरात्र होती .तरी भीमराया तुमची साथ होती .डोळ्यामधून कोसळणाऱ्या आसवांना आज मुभा आहे कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे .दलितांसाठी केलेल्या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम व त्रिवार अभिवादन करत मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे बोलत होत्या .माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा महामानव शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा .सहजासहजी न मिळणाऱ्या गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो शिक्षण हे वाघीणीचे दूध ते जे कोणी प्राशन करेल तो अन्यायाविरुध्द गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे तत्त्व सर्वसामान्य जनतेच्या मनात बिंबविनारे समस्त पददलिताचे भाग्यविधाते व जुन्झार नेते बुद्धीचा अथांग महासागर असे व्यक्तिमत्व असणारे जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तुत्वाने बुद्धीने अधिराज्य प्रस्थापित केले अश्या युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न महामानव आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .भीमराव रामजी आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी पोटाची भूक मारणारा विषमतेला जाळणारा अन्यायाला भिडणारा एक वणवा शांत झाला. डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे थोर तत्ववेत्ते राजकारणी समाजसुधारक होते .दलित बौध्द चळवळीला प्रेरणा दिली .अस्पृश्य लोकांविरुध्द होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली .महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले .स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक होते .देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार निर्माते असेही म्हणतात .डॉ .आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते .त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेच्या कार्याचा प्रभाव होता .अथांग बुद्धीमान असणारे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला फार मोठे योगदान आहे .विद्यार्थीदशेपासूनच प्रेरणादायी विचार आणि कार्य आहे .अश्या या बोधिसत्वाला कोटी कोटी मानवंदना असे मार्गदर्शन करताना रेखा सोनकवडे म्हणाल्या बनसोडे यांनी मार्गदर्शन केले .याप्रसंगी अनुसया कलशेट्टी मनिषा कुणाळे अर्चना गिरी उपस्थित होते .माजी विद्यार्थी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते .बागवान यांनी आभार मानले .
