*महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात.त्याचे योगदान महत्त्वाचे आहे : संतोष उर्फ अप्पू पराणे*
जयंती विशेष

*महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात.त्याचे योगदान महत्त्वाचे आहे : संतोष उर्फ अप्पू पराणे*

🔶अक्कलकोट* :(प्रतिनिधी) *महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले असल्याचे महाराष्ट्र माळी समाजाची तालुकाध्यक्ष तथा उद्योजक संतोष उर्फ अप्पू पराणे यांनी व्यक्त केले.*

ते अक्कलकोट बस स्थानकावरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे अवचित साधून प्रतिमेस माळी समाजाच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात उद्योगपती पराणे बोलत होते.

पुढे बोलताना उद्योगपतीप्राणे म्हणाले फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या.भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९२ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! करण्यासाठी अक्कलकोट बसस्थानक येथे महाराष्ट्र माळी समाज तालुकाध्यक्ष संतोष पराणे, शिवानंद बिदगे, शेखर अडवितोटे, काशीनाथ ईसापुरे,अप्पा दुधनी, प्रकाश कन्नाळ, विरेश कोळ्ळे, मल्लिनाथ चिंचोळी, सुरेश अडवितोटे,रवि माळी, महादेव अडवितोटे, अक्कलकोट महाराष्ट्र माळी समाज महासंघ शहर अध्यक्ष सिध्दाराम माळी,व समाज बांधव उपस्थित होते
