दानय्या कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थी सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण !
आतापर्यंत ४६२ विद्यार्थ्यांनी सेट नेट पेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.. दानय्य सरांनी दर रोज यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन करीत आहेत विद्यार्थ्यांनी याची लाभ घ्यावा अशी विनंती दानय्य सरांनी केली आहे.

दानय्या कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थी सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण !


अक्कलकोट : येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक दानय्या कौटगीमठ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणा घेऊन ७ विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षक पात्रात परीक्षा (सी टी ई टी जानेवारी २०२४) उत्तीर्ण झाले आहेत.

देशाच्या भविष्य शाळेत घडत असतो अशी वाक्यभारत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते त्या प्रमाणे आपण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शिक्षक असणे आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास होणं आवश्यक आहेत.ज्ञान व कौशल्य विद्यार्थी मध्ये रुजविण्यासाठी शिक्षक सक्षम असणे आवश्यक आहेत.शिक्षका मध्ये अध्यापन ज्ञान किती आहेत हा पाहण्यासाठी टी ई टी परीक्षा घेण्यात येत आहेत.देशातील विविध राज्यतील ६५ वेळा सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन ,जागतिक विक्रम करून ,स्वतःला मिळालेल्या अनुभव आधारे इतर विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जानेवारी २०२४ ची परीक्षा २१ जानेवारी २०२४ रोजी ऑफ लाईन पद्धतीने घेण्यात आला होता आणि या परीक्षेच्या निकाल दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी अवघ्या २५ दिवसात निकाल जाहीर केलेत .या परीक्षेत दानय्या सरांची ७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहेत

सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी पुढील प्रमाणे
१. हनुमान थावरकर ( परभणी )
२. सौ राजकन्या कांबळे ( कोल्हापूर)
३. शेखर सय्यद ( जालना ) अनाथ मुलगा , अनाथ आश्रम मध्ये राहून अभ्यास करून यशस्वी झालेत .
४. सर्जेराव माशाळे सर ( पान मंगळुर अक्कलकोट )
५. अमेय शिरवळकर ( सिंधुदुर्ग )
६.. प्राजक्ता कानेरकर ( सिंधुदुर्ग )
७. महेश विठ्ठल राव जाधव ( नांदेड )
दानय्य सरांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन आतापर्यंत ४६२ विद्यार्थ्यांनी सेट नेट पेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत.. दानय्य सरांनी दर रोज यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन करीत आहेत विद्यार्थ्यांनी याची लाभ घ्यावा अशी विनंती दानय्य सरांनी केली आहे.