*महात्मा बसवेश्वरांनी श्रम संस्कारास प्रतिष्ठा मिळवून दिली: प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील..*
जयंती विशेष

*महात्मा बसवेश्वरांनी श्रम संस्कारास प्रतिष्ठा मिळवून दिली: प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील..*

अक्कलकोट: कष्ट करून उपजीविका केली पाहिजे, स्वावलंबी जीवन जगत असताना श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे हा अर्थशास्त्रातील नवीन नियम महात्मा बसवेश्वरांनी सांगितले. त्यामुळेच श्रम संस्काराला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील (नंदगावकर) यांनी व्यक्त केला.

महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. एम. एल. गौर, डॉ शीतल झिंगाडे, प्रा भिम सोनकांबळे, विठ्ठल यरगल, महेश जोगदे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांचे सुमारे वीस वर्षे मंगळवेढ्यात वास्तव्य होते. कलचुरी राजा बिज्जल यांच्या राज्यात ते महामंत्री होते. त्यामुळे अर्थशास्त्राची चांगलीच जाण त्यांना होती. त्यामुळेच त्यांनी नवीन सिद्धांत मांडले कष्टाला पर्याय नाही, कोणासही फुकट दिल्यास वस्तूचे अगर पैशाचे मूल्य राहत नाही. म्हणून माणसांनी श्रम करून जीवन जगले पाहिजे, स्वावलंबी जीवनाचा मंत्र आत्मसात केला पाहिजे .
महात्मा बसवेश्वरांनी आपल्या राज्यातील अर्थसंकल्प देखील मांडला होता. लोकांचे जीवनमान सुधारावे म्हणून त्यांनी तरतुदी केल्या होत्या.
लोकांच्या हातास काम मिळावे म्हणून देखील त्यांनी प्रयत्न केले होते. रस्ते, विहिरी, कृषी व्यवस्था आदी ठिकाणी लोकांना काम देऊन आर्थिक स्वावलंबी करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विद्याश्री वाले यांनी केले, तर आभार प्रा. तुकाराम सुरवसे यांनी मानले.
अर्थशास्त्र मंडळाच्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, ज्येष्ठ संचालक श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी,मल्लिकार्जुन मसुती, सौ पुनम कोकळगी, सौ रूपाली शहा, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यानी कौतुक केले.

फोटो ओळ –
कल्याणशेट्टी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील व अर्थशास्त्र मंडळातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
