जेऊर येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात 19 जोडप्यांचा बांधल्या रेशीमगाठी ; वाराणसीचे पंडित दिक्षित कुटुंबीय तसेच 75 वर्ष्यावरील शेतकरी बांधवाचा झाला सन्मान
19 जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या त्यातील ज्या जोडप्यांना पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची ठेव बँकेत ठेवली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

जेऊर येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात 19 जोडप्यांचा बांधल्या रेशीमगाठी ; वाराणसीचे पंडित दिक्षित कुटुंबीय तसेच 75 वर्ष्यावरील शेतकरी बांधवाचा झाला सन्मान


अक्कलकोट, ता.11: जेऊर तालुका अक्कलकोट येथील श्री काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशिलिंग बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 19 जोडपी विवाहबद्ध झाले.याच वेळी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम म्हणून अयोध्या येथील रामललांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठानाच्या वेळी पौरोहित्य म्हणून प्रमुख भूमिका बजावलेले व जेऊर तालुका अक्कलकोटचे रहिवासी तथा

वाराणसीचे पंडित दिक्षित कुटुंबीय तसेच 75 वर्ष्यावरील 30 शेतकरी बांधवाचा देखील सन्मान करण्यात आला.सदर सामुदायिक विवाह सोहळा आणि दिक्षित कुटुंबीय व शेतकरी बांधव यांचा
सन्मान सोहळा हे दोन्ही अतिशय दिमाखदार पद्धतीने आणि शानदाररित्या संपन्न झाले.यावेळी काशी जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी , श्री शिवानंद शिवयोगी महास्वामी, श्री नीलकंठ शिवाचार्य महास्वामी, श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी, श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामी, श्री अभिनव बसवलिंग महास्वामी, श्री शिवशंकर शिवाचार्य महास्वामी, श्री चन्नमत महास्वामी, श्री शांतलिंग शिवाचार्य महास्वामी, महानंदाताई हिरेमठ, अब्दुल रौफ सरदार पाशा पिरजादे बाबा,सद्गुरू पांडुरंग महाराज आदी मठाधीश आणि आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,सिद्धार्थ गायकवाड,अशपाक बळोरगी,गुरुशांत पाटील, सिद्धाराम भंडारकवठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने यंदा जेऊरला कोरोनाकाळ वगळता सलग 9 व्या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजीला गेला होता .या संस्थेत एकूण 200 मित्रपरिवार सदस्य एकत्र येऊन तन,मन धनाने योगदान देत आहेत.काशीलिंग बहुउद्देशीय संस्थेच्या मल्लिकार्जुन पाटील व मित्रपरिवारांकडून 8 वर्षात 156 जोडपे विवाहबद्ध झाली आहेत तर चालू वर्षी सुद्धा 19 जोडप्यांचा विवाह सोहळा त्यात्या धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून वधू वरांची मिरवणूक काढण्यात आली ,सुग्रास भोजन,वऱ्हाडी मंडळींसाठी शिदोरी बांधून देणे आदींची व्यवस्था केली गेली होती .या विवाह सोहळ्याचे नियोजन काशीलिंग देवस्थान ट्रस्ट व काशिलिंग बहुउद्देशीय संस्था तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी जेऊर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली होती.तत्पूर्वी वाराणसी येथील राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेले पुरोहित तथा जेऊरचे रहिवासी सुनील लक्ष्मीकांत दीक्षित तसेच अरुण लक्ष्मीकांत दीक्षित हे दोघे बंधू सपत्नीक उपस्थित होते.यावेळी काशिलिंग बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री
मल्लिकार्जुन पाटील यांनी प्रस्ताविक करून विवाह सोहळा संयोजन उद्देश स्पष्ट केले.अक्षतासोहळ्यापूर्वी जगद्गुरू डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वचन झाले. यावेळी महेश म्हेत्री सर आणि त्यांच्या पथकाचे सुमधुर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी या एकोणीस जोडप्यांच्या 38 घरासाठी सायंकाळी घरी गेल्यावर त्यांना जेवणाची सोय व्हावी यासाठी त्यांना शिदोरी बांधून देऊन त्यांची सोय करण्यात आली.कार्यक्रमाचे उत्कृष्ठ
संयोजन श्री काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशिलिंग बहुउद्देशीय संस्था याचे पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी जेऊर यांनी केले.


वाराणसीचे दीक्षित कुटुंबीय आणि 75 वर्षांवरील शेतकरी बांधवांचा झाला सन्मान
याच कार्यक्रमात अक्षता सोहळ्यापूर्वी आयोध्या येतील राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि त्यांचे चिरंजीव सुनील आणि अरुण यांच्या पौरोहित्यात संपन्न झाला होता. ते जेऊर तालुका अक्कलकोट येथील रहिवासी असल्याचे समजल्याने त्यांना विशेष निमंत्रण देऊन कुटुंबासह बोलावून घेऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचवेळी जेऊर येथील 75 वर्षावरील 30 शेतकरी बांधवांचा देखील यथोचित सन्मान करून गौरव करण्यात आला.
पहिली मुलगी झाल्यास दहा हजाराची ठेव
या विवाह सोहळ्यात ज्या 19 जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या त्यातील ज्या जोडप्यांना पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची ठेव बँकेत ठेवली जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.