गावगाथा

अभिजीत राणे युथ फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

निबंध स्पर्धा

अभिजीत राणे युथ फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

HTML img Tag Simply Easy Learning    

अभिजीत राणे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते.निबंध १००० शब्दापर्यत कोणत्याही एका विषयावर सुवाच्च, सुंदर अक्षरात लिहून तो कुरिअर किंवा स्पीड पोस्ट ने स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे २/१२ पार्वती निवास, रामनगर बंद्रेकरवाडी जोगेश्वरी पूर्व, मुंबई ४०००६० येथे १० जून २०२४ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे २००१/- १५०१/- १००१/- रू रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.सहभागी सर्व स्पर्धकांना देखील सहभाग सन्मानपत्र देण्यात येईल.मी पंतप्रधान झालो तर, व्यसन…तरुणांना लागलेली कीड, आत्मनिर्भर भारत, वृद्धाश्रम…गरज कोणाची ? बळीराजा सुखी केव्हा होणार ? हे निबंधाचे विषय आहेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन फाउंडेशन चे संस्थापक अभिजीत राणे यांनी केलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button